शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पीएमएस प्रणाली, अखर्चित निधीवरून जिल्हा परिषद सभेत वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:11 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अखर्चित निधीवर वादळी चर्चा झाली. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील ८३ कोटींचा निधी शासन दरबारी जमा झालेला असताना सन २०१८-१९ वर्षातील २३० कोटींचा निधी अखर्चित असल्याच्या कारणावरून सदस्यांनी प्रशासनावर चांगलेच फैलावर घेतले. निधी वेळेत खर्च न झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी सदस्यांनी केली.

ठळक मुद्देनिधी खर्च न झाल्यास अधिकारी जबाबदार

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अखर्चित निधीवर वादळी चर्चा झाली. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील ८३ कोटींचा निधी शासन दरबारी जमा झालेला असताना सन २०१८-१९ वर्षातील २३० कोटींचा निधी अखर्चित असल्याच्या कारणावरून सदस्यांनी प्रशासनावर चांगलेच फैलावर घेतले. निधी वेळेत खर्च न झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी सदस्यांनी केली.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत, संजय बनकर यांनी अखर्चित निधीचा मुद्दा उपस्थित करून वेळेत निधी खर्च का झाला नाही, अशी विचारणा केली. निधीचे नियोजन होऊनही निधी खर्च केला जात नाही, प्रशासकीय मान्यता होऊनही कार्यारंभ मिळालेला नाही, अशा तक्रारी सदस्यांनी केल्या. अशाच प्रकारे कामकाज होणार असेल तर, निधी कसा खर्च होणार? असा सवाल डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केला. कामांना प्रशासकीय मान्यता देऊन, कार्यारंभ आदेश मिळत नसल्याने कामांना सुरुवात झालेली नसल्याचे सिद्धार्थ वानरसे, आश्विनी आहेर यांनी निर्देशनास आणले. विकासासाठी निधी प्राप्त होऊनही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे तो पडून राहत असल्याची तक्रार करण्यात आली. २३० कोटींचा निधी खर्च झालेला नाही हे सत्य आहे. या निधी खर्चासंदर्भात विभागप्रमुखांची बैठक घेऊन नियोजन करण्यात आले आहे. सर्व विभागप्रमुख त्यादृष्टीने कामाला लागले असल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी भुवनेश्वर एस. यांनी सांगून मार्च २०२० अखेर हा निधी खर्च होईल, असे आश्वासित केले. सभेला उपाध्यक्ष नयना गावित, सभापती मनीषा पवार, यतिंद्र पगार, सुनीता चारोस्कर, अर्पणा खोसकर, सामान्य प्रशाासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदरावपिंगळे, ग्रामपंचायत विभागाचे रवींद्र परदेशी यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.बांधकाम विभागातील कामांची बिले काढण्यासाठी असलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पीएमएस)प्रणालीचा फटका बसतो का? अशी विचारणा बनकर, सिद्धार्थ वनारसे यांनी केली. यावर कार्यकारी अभियंत्यांनी याप्रणालीत वेळ जात असल्याने बिले वेळेत निघत नसल्याचे सांगितले. त्यावर मार्च २०२० पर्यंत ही प्रणाली बंद करण्याची मागणी सदस्यांनी केली. मात्र, याप्रणाली सुधारणा झाल्याचा दावा भुवनेश्वर एस. यांनी करत, दोन आठवड्यांचा अवधी द्या, अशी मागणी केली. या कालावधीप्रणाली योग्य ती सुधारणा न झाल्यास पूर्वीप्रमाणेच बिले काढली जातील असे भुवनेश्वर एस. यांनी स्पष्ट केले. मार्चअखेर निधी खर्च न झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील त्यासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे इशारा अध्यक्ष सांगळे यांनी दिला.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक