शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी मोसम नदीपात्रात घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:33 IST

मालेगाव शहरातील बाजार परिसरातील मांस, मत्स व इतर व्यावसायिकांकडून कचराकुंडी म्हणून घाणकचरा टाकण्यासाठी मोसम नदीपात्राचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

ठळक मुद्देदुर्गंधी : महानगरपालिकेचे दुर्लक्ष; शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मालेगाव मध्य : शहरातील बाजार परिसरातील मांस, मत्स व इतर व्यावसायिकांकडून कचराकुंडी म्हणून घाणकचरा टाकण्यासाठी मोसम नदीपात्राचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.वेळोवेळी तक्रार करूनही मनपाकडून स्वच्छता होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाच्या स्वच्छता विभागाने नदीपात्राची स्वच्छता करीत टाकाऊ पदार्थ टाकणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.शहरातून गेलेल्या मोसम नदी एकेकाळी मोक्षगंगा म्हणून ओळखली जात होती. तथापि मागील अनेक वर्षांपासून पर्जन्यवृष्टीचा अनियमिततेमुळे नदी आगामी पावसाळ्याचा अपवादवगळता नदीपात्र कोरडे पडलेले असते. शहराच्या प्रवेशद्वारापासून ते म्हाळदे शिवारातील कचरा डेपोपर्यंत शहरातील गटारीचे दूषित पाणी ठिकठिकाणी नदीपात्रात सोडण्यात येते. त्यामुळे गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच सांडवापूल ते रामसेतूदरम्यान असलेल्या बाजारातील मासे, कोंबडीचे काही व्यावसायिकांकडून टाकाऊ पदार्थ टाकण्यासाठी नदीपात्राचा सर्रास वापर केला जात आहे. इतर व्यावसायिकांकडूनही घाणकचरा टाकण्यात येतो. सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून मनपाकडे अनेकवेळी तक्रारी करण्यात येते मात्र मनपा प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे घाणकचरा व टाकाऊ पदार्थ कुजून परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने जातीने लक्ष देत नदीपात्राची स्वच्छता करून नदीपात्रात घाणकचरा व टाकाऊ पदार्थ टाकणाºया व्यवसायिकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांसह रहिवाशांकडून करण्यात येत आहे. आज दुपारी रामसेतूलगतच्या नदीपात्राची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

उद्या तातडीने रामसेतू येथील स्वच्छता करण्यात येई. मच्छीबाजारातील व्यावसायिकांसाठी स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. यापुढे नदीपात्रात टाकाऊ पदार्थ व घाणकचरा टाकू नये म्हणून समज देण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारे नदी प्रदूषण करणाºयांवर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल.

- अनिल पारखे, स्वच्छता निरीक्षक, मनपा

परिसरातील व्यावसायिकांकडून नदीपात्राचा कचराकुंडी म्हणून वापर केला जात आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वेळोवेळी मनपाकडे तक्रारी करीत मनपाचे लक्ष वेधण्यात येते. मात्र मनपा प्रशासनाकडून सदर समस्येकडे दुर्लक्ष केले जाते.- रामदास बोरसे, अध्यक्ष, नागरी सुविधा सेवा समिती

टॅग्स :environmentपर्यावरण