शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ बालगृहातील गैरप्रकारावर पांघरूण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 01:08 IST

पेठ : येथील कापूर झरीपाडा अनाथ मुलींच्या बालगृहातील अनेक गैरप्रकार घडत असतांना महिला व बालविकास विभाग याकडे डोळेझाक करत असल्याची चर्चा आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : येथील कापूर झरीपाडा अनाथ मुलींच्या बालगृहातील अनेक गैरप्रकार घडत असतांना महिला व बालविकास विभाग याकडे डोळेझाक करत असल्याची चर्चा सुरू असून शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या येथील मुलींची एक वर्षापासून आरोग्य तपासणीच झाली नसल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. कोणत्याही निवासी शाळा अथवा वस्तीगृहात राहणाऱ्या मुलांची नियमीत आरोग्य तपासणी करण्याबाबत शासनाचा दंडक असून तालुक्यातील शासकिय आश्रमशाळा व अनुदानित वस्तीगृहातील मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ग्रामीण रु ग्णालय पेठ अंतर्गत स्वतंत्र फिरते पथक तयार करण्यात आले आहे. कापुरझरीपाडा येथील अनाथ बालगृहात उघडकीस आलेल्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणीबाबत आढावा घेतला असता. ग्रामीण रु ग्णालयाच्या तपासणी पथकाच्या अंतर्गत सदरचे बालगृह येत नसून त्यांनी तपासणीची लेखी मागणी केली तरच वैद्यकिय तपासणी करण्यात येते. मात्र यापूर्वी १ जूलै २०१६ रोजी या मुलींची केवळ आजारासंदर्भात तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित व्यवस्थापनाकडून कोणत्याही प्रकारची तपासणी करण्याबाबत कळवले नसल्याचे वैद्यकिय आधिकाऱ्यांनी सांगितले. यावरून या बालगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींची तब्बल एक वर्षापासून वैद्यकीय तपासणी झाली नसतांनाही ही बाब प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीत लक्षात कशी आली नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळशासनाच्या नियमानुसार या बालगृहाला १३० मुलींची मान्यता असतांना प्रत्यक्षात ५८ मुली आढळून आल्या. किती मुली दाखल झाल्या व त्यापैकी किती सोडून गेल्या याबाबतची माहिती देण्यास चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशयाची सुई दिसते. सदरचा संपूर्ण प्रकार उघडकीस आणलेल्या पिडीत मुलीबरोबर अत्याचाराच्या बळी पडलेल्या अजून काही मुली या बालगृहातून अचानक गायब झाल्याचे गुढही या तपासात उघडकीस येण्याची चिन्हे दिसून येत आहेत. सद्या या बालगृहातील ५८ मुलींना नाशिक शहरात दाखल करण्यात आले असून त्यांच्या शाळा व महाविद्यालयातील उपस्थितीबरोबर त्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होणार असून प्रशासनाने तात्काळ त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था लावण्याची आवश्यकता आहे.