शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
"हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
4
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
5
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
6
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
7
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
9
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
10
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
11
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
12
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
13
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
14
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
15
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
16
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
17
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
18
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
19
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
20
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ना जत्रा, ना यात्रा, गावाेगावी कोरोनाचा खतरा; तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 18:48 IST

सचिन सांगळे नांदूरशिंगोटे : गत दोन वर्षांपासून सर्वजण कोरोनाच्या सावटाखाली जगत आहेत. त्यामुळे यावर्षी ग्रामीण भागातील गावागावांतील जत्रा भरतील, ...

सचिन सांगळे

नांदूरशिंगोटे : गत दोन वर्षांपासून सर्वजण कोरोनाच्या सावटाखाली जगत आहेत. त्यामुळे यावर्षी ग्रामीण भागातील गावागावांतील जत्रा भरतील, असे वाटत असतानाच पुन्हा ओमायक्रॉनचे संकट उभे राहिले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला तो मोलमजुरी करणाऱ्या तसेच गावच्या जत्रांवर अवलंबून असलेल्या तमाशा, ऑर्केस्ट्रा, मंडप डेकोरेटर, खेळणीसह विविध प्रकारचे दुकानदार या व्यावसायिकांना. सध्या यात्रांचा हंगाम असला तरी कोरोनामुळे यात्रा बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे व्यवसाय बंद असून या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

चंपाषष्ठीनंतर ग्रामीण भागातील यात्रा उत्सव सुरू होतो. यात्रा म्हटले की वर्षभरातील कामातून वेळ काढून देवदेवतांचे दर्शन आणि निखळ मनोरंजन एक हौस वेगळीच असते. यादरम्यान, नोकरी कामधंद्यासाठी गाव सोडून इतरत्र गेलेले ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहकुटुंब गावाला येत असतात. त्याचप्रमाणे सासुरवाशीण मुली-महिला आपल्या माहेराला, पाहुणे मोठ्या उत्साहाने यात्रेस येत असतात. दोन दिवसांच्या या यात्रेत देवदेवतांची पूजा, पुरणपोळीचा नैवेद्य, ढोल, लेझीम, छबिना, मिरवणूक, आरती, कुस्त्या व ऑर्केस्ट्रा, तमाशा असे मनोरंजनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले जातात. त्यामुळे जत्रेचा एक वेगळाच आंनद अनुभवयास मिळत असतो. गावातील रथ मिरवणुकीत आबालवृद्धांसह तरुण वर्ग तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात. मात्र कोरोनाच्या संकटाने सर्वांचाच हिरमोड झाला आहे. २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तर यावर्षी ओमायक्रॉनचे संकट वाढत असल्यामुळे शासनाने पर्यटनासह विविध कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे यावर्षी ओमायक्रॉनमुळे या सर्वांवर विरजण पडले आहे. सध्या तालुक्यातील विविध भागांतील यात्रा, उत्सव सुरू झाले आहेत. मात्र, अगदी साध्या पद्धतीने हे सण, उत्सव साजरे करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील गावे या चार महिन्यांत खूप गजबजलेली असतात परंतु आता कोरोनामुळे जत्रा असूनदेखील गजबजलेली गावे अगदी शांत वाटत आहेत.

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

कोरोनामुळे जत्रा साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विविध खेळणी, फरसाण, भेळ, जेवण बनवणारे केटरर्सवाले, ढोल-लेझीम खेळ, झांज पथके, ऑर्केस्ट्रा हे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे आर्थिक संकटात सापडले आहेत. तर तमाशा कलावंतांवर तीन वर्षांपासून जत्राच भरत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या कलावंतांना शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या