शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मक्यासह बाजरीच्या कणसांना शेतातच फुटले कोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 14:23 IST

उमराणे : गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे उमराणेसह परिसरातील खरीप हंगामातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या मका, बाजरी पिकांच्या कणसांना शेतातच कोंब फुटू लागल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.

उमराणे : गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे उमराणेसह परिसरातील खरीप हंगामातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या मका, बाजरी पिकांच्या कणसांना शेतातच कोंब फुटू लागल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करु न नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांनी काढलेल्या पिकविम्याची रक्कम मिळवुन द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या तीन आठवड्यापूर्वी परतीच्या पावसाने झोडपल्यानंतर उंबºयावर आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ही झळ सोसून अस्मानी संकटातून वाचलेल्या पिकांची सोंगणी व कापणी सुरु असतानाच गेल्या सहा दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतात कापुन पडलेल्या बाजरी व मका पिकांच्या चाºयाची नासाडी तर झालीच परंतु लष्करी अळींच्या तावडीतून थोड्याफार प्रमाणात वाचलेल्या कणसांनाही पावसामुळे शेतातच कोंभ फुटू लागल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे.पावसामुळे शेतातील कामे खोळंबल्याने शेतकऱ्यांना लवकर पाऊस उघण्याची प्रतिक्षा आहे. दरम्यान चालू वर्षी जवळपास सर्वच शेतकर्यांनी पिकविमा काढला असुन खिरपाच्या सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने तात्काळ महसुल विभागामार्फत पंचनामे करु न नुकसानभरपाई म्हणून विमारक्कम जाहीर करावी अशी मागणी बाधीत शेतकर्यांकडुन जोर धरू लागली आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या तीव्र दुष्काळाची झळ सोसल्यानंतर चालुवर्षी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कंबर कसलेल्या शेतकर्यांना सुरु वातीपासूनच अस्मानी सुलतानी संकटांना सामोरे जावे लागले असुन सुरु वातीला पावसाचे उशिरा आगमन, त्यानंतर मका व बाजरी पिंकावर लष्करी अळींचा प्रादुर्भाव, त्यानंतर परतीचा पाऊस व पुन्हा गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.परिणामी पिकांपासुन मिळणारे उत्पन्न तर दूरच परंतु उत्पादनासाठी केलेला खर्चही या अस्मानी सुलतानी संकटामुळे वसुल होणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक