शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

जुळ्या भावांपैकी करणला आदिलाबाद येथे कामासाठी का पाठविले असा प्रश्न गुरुवारी रात्री अर्जुनने मोठा भाऊ गोपाल यास विचारला. यावेळी गोपाल हेडफोन लावून मोबाईलवर गाणे ऐकत होता. अर्जुनने विचारलेल्या प्रश्नाकडे गोपालचे लक्षच नव्हते. मात्र आपल्या प्रश्नाला गोपाल प्रतिसाद देत नाही असा गैरसमज झाल्याने रागाच्या भरात अर्जुनने गोपालवर लोखंडी पाईपने हल्ला चढविला.

ठळक मुद्देचिल्ली इजारातील घटना : लोखंडी पाईपचा वापर, आरोपी फरार, जंगलात शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : घरगुती क्षुल्लक वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा लोखंडी पाईपने हल्ला चढवून निर्घृण खून केल्याची घटना तालुक्यातील चिल्ली इजारा या गावात गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
गोपाल पांडुरंग राठोड असे मृताचे नाव आहे. महागावपासून १३ किलोमीटर अंतरावर चिल्ली इजारा येथे गोपालचे आईसह चार जणांचे कुटुंब आहे. त्यात तीन भावंडे आहेत. त्यापैकी करण-अर्जुन हे दोघे जुळे आहेत. एक विवाहित बहीण आदिलाबादला राहते. जुळ्या भावांपैकी करणला आदिलाबाद येथे कामासाठी का पाठविले असा प्रश्न गुरुवारी रात्री अर्जुनने मोठा भाऊ गोपाल यास विचारला. यावेळी गोपाल हेडफोन लावून मोबाईलवर गाणे ऐकत होता. अर्जुनने विचारलेल्या प्रश्नाकडे गोपालचे लक्षच नव्हते. मात्र आपल्या प्रश्नाला गोपाल प्रतिसाद देत नाही असा गैरसमज झाल्याने रागाच्या भरात अर्जुनने गोपालवर लोखंडी पाईपने हल्ला चढविला. यात गोपालचा जागीच मृत्यू झाला. पोलीस पाटील राजू राठोड यांनी घटनेची माहिती महागाव पोलिसांना दिली. पोलिसांनी रात्रीच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुसदला रवाना केला. आरोपी अर्जुन याने घटनेनंतर पोबारा केला. गोपालच्या वडिलांचा चार वर्षांपूर्वी अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला होता. मृतक गोपाल हा घरातील कमावता व्यक्ती होता. त्याच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. करण व अर्जुन यांना नृत्य व अभिनयाची आवड आहे. हा छंद जोपाण्यासाठी ते काही दिवसापूर्वी पुणे येथे गेले होते. मात्र संधी न मिळाल्याने ते गावात परतले. मात्र ते कुठेच काम करीत नसल्याने गोपालचा नेहमीच वैताग व्हायचा, त्यातूनच त्याने करणला रोजगार शोधण्यासाठी पाठविले होते.
मात्र हेच कारण गोपालच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरले. या घटनेचा तपास उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार यांच्या मार्गदर्शनात महागावचे ठाणेदार दामोधर राठोड, बीट जमादार माणिक पवार करीत आहे. आरोपी अर्जुन हा लगतच्या जंगलात लपून बसला असावा असा संशय आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी त्याची शोधमोहीम चालविली आहे.

टॅग्स :Murderखून