शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव वाखारीत कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 23:35 IST

पिंपळगाव वाखारीत कृत्रिम पाणीटंचाई

पिंपळगाव वाखारी : येथे दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या कृत्रिम पाणीटंचाईचा उद्रेक होऊन महिलांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. पाणीटंचाईबाबत ग्रामस्थांच्या उद्रेकाला कारणीभूत पाणीपुरवठा योजनेचे सुरू असलेले संथ काम आणि ग्रामपंचायतचे भोंगळ नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सकाळी साडेनऊ वाजता ग्रा. पं. कार्यालयावर आलेल्या हंडा मोर्चाला सामोरे जाण्यासाठी ग्रा. पं. कार्यालयात ग्रा. पं. कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच व सदस्य कोणीच उपस्थित नसल्याने मोर्चेकऱ्यांनी जि. प. सदस्य भारती पवार यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली असता त्यांच्या सांगण्यावरुन नंतर सर्व धावपळ करत कार्यालयात पोहचले.पिंपळगाव वाखारी येथे काही महिन्यांपासून ग्रामस्थांना पिण्याच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने होणारी पाणीटंचाई ग्रामस्थांनी समजून घेतली; परंतु कासवगतीने पूर्णत्वाला गेलेली ही योजना अजून पिंपळगावकरांची पाणीटंचाई दूर करू शकली नाही. गावासाठी पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असतानाही ५-६ दिवस पाणी सोडले जात नाही. याबाबत विचारणा करणाऱ्यांना वीज वितरण कंपनीची अडचण सांगून वेळ निभावली जात आहे. पिण्याचा पाणी प्रश्न सोडवताना असणाऱ्या अडचणी युद्ध पातळीवर सोडविण्याची गरज असता त्याबाबत ग्रामपंचायत स्तरावर उदासीनता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.