शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : युतीची प्रतिक्षा ; तर आघाडीत चलबिचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 12:14 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  विधानसभा निवडणुका जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषत: ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  विधानसभा निवडणुका जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषत: गेल्या महिनाभरापासून इच्छूक उमेदवारांनी या ना त्या माध्यमातून मतदारांशी संपर्क वाढविल्याने राजकीय हवा तापविली आहे. सर्वच इच्छूक उमेदवारी मिळविण्याचे डावपेच आखत असले तरी अद्याप भाजप-शिवेसेनेची युती झाली नसल्याने त्याचा प्रतिक्षेत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी या पक्षातील काही इच्छुकांचे डोळेही भाजपच्या उमेदवारीकडे लागले असल्याने आघाडीतही सध्या चलबिचल निर्माण झाली आहे.  जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. त्यापैकी गेल्या निवडणुकीत नंदुरबार आणि शहादा या जागा भाजपने तर अक्कलकुवा आणि नवापूर या जागा  काँग्रेसने जिंकल्या होत्या. यावेळी मात्र राजकारणाची स्थिती बदलली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने ब:यापैकी यश मिळविल्याने नव्या आणि जुन्या कार्यकत्र्यानाही भाजपचे वेध लागले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत तसेच काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य किरसिंग वसावे, गेल्यावेळी अक्कलकुवा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणारे उमेदवार विजय पराडके यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नवापूर, अक्कलकुवा आणि शहादा या तीनही मतदारसंघात कार्यकत्र्याचे राजकीय स्थित्यंतर झाले आहे. याशिवाय अजूनही काही मातब्बर व उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या कार्यकत्र्यानीही भाजपकडूनच उमेदवारी मिळावी यासाठी प्रय}रत आहेत.दुसरीकडे भाजप, शिवसेना यांची युती होते की नाही याबाबत सर्वाचे लक्ष असून एक वरिष्ठ नेता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. युती झाली तर भाजपला कोणत्या जागा आणि शिवसेनेला कोणत्या जागा मिळतील      याबाबतही अंतर्गत कलहाचे राजकारण सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी सर्वजागा काँग्रेसलाच मिळणार असल्याची चर्चा  आघाडीत सुरू झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. वंचीत बहुजन आघाडी नाराजांवर डोळा ठेवून असून ऐनवेळी आयते निवडणुक  लढविण्यासाठी मजबूत उमेदवार कसे मिळतील यासाठी प्रय}शील आहेत. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील राजकारण कसे वळण घेते याकडे आता सर्वाचे लक्ष लागून आहे. 

जिल्ह्यातील प्रचाराची धूरा बिगर आदिवासी नेत्यांकडे राहणार आहे. त्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भुमिका महत्वाची राहणार आहे. तर भाजपची धूरा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व सातपुडा कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील सांभाळतील

पद्माकर वळवी व राजेंद्र गावीत यांची प्रतिष्ठा पणाला

तब्बल तीन वेळा आमदार म्हणून विजयी झालेले व राज्यमंत्री आणि कॅबीनेट मंत्री म्हणून पदावर राहिलेले अॅड.पद्माकर वळवी यांची मात्र यावेळी कसोटी आहे. गेल्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. लोकसभा निवडणुकीसाठी देखील ते काँग्रेसतर्फे इच्छूक होते. यावेळी मात्र शहादा मतदारसंघातून ते इच्छूक आहेत. ही जागा काँग्रेसलाच मिळणार असल्याचे सांगितले जात असले तरी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत हे देखील मात्र उमेदवारीसाठी आघाडीतर्फे दावेदार असल्याने या ठिकाणी उमेदवारी मिळविण्यासाठी दोघांची कसोटी आहे. 

15 ते 30 वर्ष लोकप्रतिनिधी..जिल्ह्यात विजयाची डबल हॅट्रीक करणारे विद्यमान तीन आमदार आहेत. त्यापैकी आमदार अॅड.के.सी.पाडवी हे सलग सातवेळा विजयी झाले आहेत. सुरुवातीला जनता दल, अपक्ष आणि काँग्रेस असा त्यांचा प्रवास राहिला आहे. तर डॉ.विजयकुमार गावीत हे सलग सहा वेळा निवडणुकीत विजयी झाले आहेत. सुरुवातीला अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक हे देखील सर्वाधिक वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. 1981 ते 2009 र्पयत ते सतत आमदार राहिले आहेत. 2009 मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यानंततर 2014 मध्ये ते पुन्हा निवडून आले. काँग्रेसचे ते एकनिष्ठ राहिले. 

नंदुरबारात काँग्रेस तरुण चेहरा देणार4नंदुरबार विधानसभा मतदारसंघात डॉ.विजयकुमार गावीत यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे यापूर्वी माजी आमदार इंद्रसिंग वसावे, कै.प्रताप वळवी, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे यांना उमेदवारी दिली होती. मात्र यश आले नाही.  यावेळी पुन्हा नव्या तरूण चेह:याचा शोध सुरू आहे. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.राजेश वळवी यांचे नाव चर्चेत आहे.

राजकीय घराण्यातील नवे वारसदार मैदानात उतरणार..4जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक, तब्बल नऊ वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम करणारे ज्येष्ठे नेते माणिकराव गावीत, तब्बल सहा वेळा विधानसभा निवडणूक जिंकून व मंत्रीपदावर राहून काँग्रेसला शह देणारे डॉ.विजयकुमार गावीत या तिन्ही नेत्यांच्या राजकीय घराण्यातील वारसदार या निवडणुकीत मैदानात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.4 माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवापूर मतदारसंघातून यावेळी भाजपतर्फे निवडणुकीसाठी ते इच्छूक आहेत. ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे वय 82 झाले आहे. वयोमानाने ते थकल्याने नवापूर मतदारसंघातून यावेळी काँग्रेसकडून त्यांचे पूत्र शिरिष नाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 4डॉ.विजयकुमार गावीत यांच्या लहान कन्या डॉ.सुप्रिया गावीत या देखील यावेळी अक्कलकुवा अथवा इतर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी करीत आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकारणातील नवी पिढी मैदानात दिसेल असे चित्र आहे.