शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात सव्वाचारशे कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी आता तीन हजाराच्या घरात पोहचली आहे. मयतांची संख्या देखील ७८ झाली ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी आता तीन हजाराच्या घरात पोहचली आहे. मयतांची संख्या देखील ७८ झाली आहे. दररोज किमान २०० स्वॅब अहवालांची तपासणी केली जात असून त्यातून किमान १०० अहवाल हे पॉझिटिव्ह येत आहेत. किमान ५० टक्के अहवाल दररोज पॉझिटिव्ह येत असल्यामुळे प्रशासनावरील ताण वाढत आहे. दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. गुरुवारी ३०८ जण बरे झाले. त्यातील बुधवारी १२३ जण कोरोना कक्षात उपचार घेत होते. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनाबाधितांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत असून आज दिवसभरात ३०८ बाधित उपचाराअंती बरे होऊन घरी परतले. बुधवारी देखील १२३ बाधितांना कारोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले होते.
जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय येथील कोविड रुग्णालयात तीव्र लक्षणे असलेल्या बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. याठिकाणी आॅक्सिजन आणि व्हेंटीलेटरची सुविधा आहे. तर लक्षणे नसणाºया रुग्णांवर एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल नंदुरबार, शहादा, नवापूर आणि सलसाडी येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार करण्यात येत आहे. नंदुरबार आणि नवापूर येथे प्रतयेकी दोन खाजगी रुग्णालयात देखील शासनाने निश्चित केलेल्या शुल्का नुसार कोविड बाधितांवर उपचाराची सुविधा आहे.
बाधित रुग्णांची संपर्क साखळी शोधून त्यांची स्वॅब चाचणीदेखील वेळेवर करण्यात येत असल्याने आजाराची प्राथमिक लक्षणे असतानाच उपचार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे उपचारानंतर बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. खाजगी रुग्णालयातील ताप असलेल्या रुग्णांची माहिती घेऊन त्यांची देखील स्वॅब तपासणी करण्यात येत आहे. दररोज तालुकानिहाय स्वॅब तपासणीचा आढावा प्रशासन स्तरावर घेण्यात येत आहे. स्वॅब तपासणी वाढवून संपर्क साखळी खंडीत करण्याचे निर्देश पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी दिले आहेत.
मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना नियंत्रणसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. आरोग्य विभाग, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, नगर पालिका, ग्रामपंचायत आदी सर्व यंत्रणांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यासोबत नागरिकांचे सहकार्य महत्वाचे असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे. आजाराची लक्षणे आढळताच त्वरीत स्वॅब चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत २,८३३ कोविड पॉझिटीव्ह आढळले असून त्यापैकी १,७०६ बरे झाले आहेत. १,०४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ७८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. स्वॅब चाचणी वाढल्याने मृत्यू दरातही सुधारणा होत आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा होऊन तो ६० टक्क्यापर्यंत पोहोचला असून मृत्यू दर ५.५ टक्क्यावरून २.८ टक्क्यावर आला आहे. यात आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न प्रशासन स्तरावर करण्यात येत आहे.
कोरोना आजाराची लक्षणे असल्यास त्वरीत स्वॅब घेऊन चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. स्वॅब चाचण्यांची संख्या १० हजारावर पोहोचली आहे. त्यासाठी तालुका स्तरावर मोबाईल टीम नेमण्यात आल्या आहेत. तीव्र लक्षणे असणाºयांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रॅपीड अँन्टीजन टेस्टची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वॅब चाचणीचे प्रमाण वाढल्याने आणि नंदुबार येथेच लॅब सुरू झाल्याने वेळेवर उपचार करणे शक्य झाले आहे.