शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
2
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
3
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
4
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
5
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
6
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
7
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
8
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
9
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
10
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
11
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
12
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
13
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
14
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
15
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
16
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
17
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
18
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
19
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
20
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामात यंदा २ लाख ७७ हजार हेक्टरचे उद्दीष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली असून बाजारात बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली असून बाजारात बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. साधारणत: २ लाख ७७ हजार हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी एवढ्यात पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, उन्हाळी हंगामात १९ हजार हेक्टरवरील पीकं लॉकडाऊनमुळे बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने हातची गेल्याचे चित्र आहे.सर्वसाधारणपणे ७ जूनपासून पावसाळा सुरू होत असतो. गेल्या तीन दिवसांपासून झालेला पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस होता. जमिनीत बºयापैकी ओल करणारा पाऊस असला तरी पेरणीयोग्य नसल्याचा निर्वाळा आधीच कृषी विभागाने दिलेला आहे. खरीपाच्या पार्श्वभुमीवर बाजारात विविध पिकांचे बियाणे व खते उपलब्ध झाली आहेत. कृषी विभागाने मागणी केलेल्या आवंटनाप्रमाणे त्याची उपलब्धता झाली असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.सर्वाधिक कापूसचे क्षेत्रजिल्ह्यात खरीपाचे सर्वसाधारण २ लाख ७७ हजार ८०५ हेक्टर क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र हे कापूस पिकाचे १ लाख ६ हजार इतके आहे. त्या खालोखाल सोयाबीनचे २७ हजार ८९ हेक्टर क्षेत्र आहे. भाताचे २० हजार ८९५, ज्वारीचे ३० हजार १२६, मकाचे ३१ हजार ९२८, उडीदाचे १२ हजार ६६८, ऊसचे १० हजार ८८१ हेक्टर क्षेत्र आहे. याशिवाय बाजरी, तूर, मूग, भुईमूग, तीळ, सूर्यफूल यांचेही क्षेत्र बºयापैकी आहे.३८ हजार क्विंटल बियाणेखरीप हंगामासाठी साधारणत: ३८ हजार ६६८ क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचा कृषी विभागाचा दावा आहे. सध्या बियाण्यांची मागणी मर्यादीत स्वरूपात असल्याचे विक्रेत्यांचे म्हणने आहे. बी.टी.कापसाचे साधारणत: अडीच हजार क्विटल बियाणे उपलब्ध आहेत. महाबीज आणि खाजगी कंपन्यांकडून विविध वाणांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात महाबिजकडून १२ हजार ३८८ तर खाजगी कंपनींकडून २६ हजार २८० क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.खताचे आवंटन मंजूरखतांची उपलब्धता देखील बºयापैकी आहे. युरियाची सर्वाधिक ७० हजार २६० मे.टन मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४७ हजार ३०० मे.टन आवंटन मंजूर करण्यात आले आहे. सद्य स्थितीत ४९ हजार ३०३ मे.टन युरिया उपलब्ध आहे. अमोनियम सल्फेटचा ४१५ मे.टन साठा, एमओपीची ७,८४० मे.टन मागणी असून ९,८०० मे.टन आवंटन मंजूर झाले आहे. एकूण ११, ४०९ मे.टन उपलब्ध आहे. डीएपीचे ६, ११५ मे.टन खत उपलब्ध आहे. एसएसपीचे ११,५०० मे.टन मागणी आहे. त्यापैकी ३ हजार २३ मे.टन उपलब्ध असून एकुण २०, १७३ मे.टन साठा उपलब्ध आहे. संयुक्त खताची मागणी १६,७१० मे.टन होती त्यापैकी १९,४८० मे.टन मंजूर झाले. आधीचे ३,४४४ मे.टन एकूण २२,९२४ मे.टन साठा उपलब्ध आहे. मिश्रखताचे ५३६ मे.टन खतसाठा उपलब्ध आहे. एकुण खतांची १ लाख १८ हजार १६० मे.टन मागणी असून त्यापैकी ९८ हजार ९३० मे.टन आवंटन मंजूर आहे. एकुण १ लाख १० हजार ८७५ मे.टन खत साठा उपलब्ध आहे.उन्हाळी हंगाम लॉकडाऊनमध्येजिल्ह्यात १९ हजार ३४० हेक्टरवर उन्हाळी पिके होती उन्हाळी बाजरी १ हजार ४२६ हेक्टर, उन्हाळी मका १ हजार ६१९, मूग १ हजार ४४४, भूईमूग १ हजार ४१, सूर्यफूल १८२, बार्टी ४१ या धान्य, कडधान्य आणि तेलबिया पिकांची एकूण ६ हजार ३५५ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती़ दुसरीकडे फळे आणि भाजीपाला पिकांची एकूण १२ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली होतीे़ यात कांदा ७९०, वांगी ४७, मिरची ७५, भाजीपाला ४३२, टरबूज ८३४, केळी २७७, पपई ६७ तर ऊस ४ हजार ५८ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आला़ एकूण १२ हजार ९८५ हेक्टरवर ही पिके होती विशेष बाब म्हणजे यंदाही उन्हाळी पिकातून ज्वारी, तीळ, सोयाबीन हे बाद झाले असल्याचे दिसून आले़ तर लागवड पिकांचे क्षेत्र हे कमीच आहे़