शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासाच्या चळवळीला दिशा देणारा सोनपाडाचा ‘मानसिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 11:54 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :गावाच्या रस्त्याभोवती साचणारे उकिरडे, कचरा यामुळे आरोग्याला घातक ठरलेल्या अस्वच्छतेवर मात करण्यासाठी ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :गावाच्या रस्त्याभोवती साचणारे उकिरडे, कचरा यामुळे आरोग्याला घातक ठरलेल्या अस्वच्छतेवर मात करण्यासाठी सोनपाडा, ता.नवापूर येथील मानसिंग वळवी व त्यांच्या साथीदारांनी सुरू केलेली चळवळ ही निश्चितच ग्रामिण युवकांपुढे आदर्श निर्माण करणारी आहे. या उपक्रमातून गावात स्वच्छता तर झालीच पण अनेकांना उद्योग-व्यवसायही मिळाल्याने समृद्धीचा नवा मार्ग त्यांनी उभा केला आहे.सोनपाडा हे १०० टक्के आदिवासी वस्तीचे गाव. या गावात कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथील तज्ज्ञांनी भेट देवून शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन मेळावा घेतला होता. त्यावर प्रभावीत होऊन मानसिंग एनथा वळवी व त्यांच्या काही सहकार्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला आणि काय करता येईल यावर चर्चा केली. त्यातूनच गावाच्या रस्त्याभोवती उकीरडे व कचरा जास्त असल्याचे मानसिंग वळवी यांनी सांगितले.त्यातूनच गांडूळ खत निर्मितीची संकल्पना पुढे आली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सुरुवातीला केवळ पाच बेडचा गांडूळखत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला. त्यासाठी गावातील शेतकऱ्यांचे शेनखत विकत घेतले व रस्त्याभोवती साचलेला कचरा गोळा केला. पहिल्या वर्षाचा यशस्वी प्रयोगानंतर त्याचा विस्तार केला.गेल्या पाच वर्षापासून हा उपक्रम सुरू असून यावर्षी १०९ टन गांडूळ खत निर्मिती केली आहे. गावातील शेतकºयांचे शेनखत त्यासाठी घेतले जाते. याच बरोबर बचत गटाच्या माध्यमातून दाळमिळही सुरू केली आहे. त्याला आता मुंबईतही मागणी वाढल्याने मुंबईचा लोकांचा मागणीच्या धरतीवर या प्रकल्पाला नवा आकार देण्याचाही प्रयत्न सुरू आहे.गांडूळखत निर्मितीमुळे शेती विकासालाही चालना मिळाली आहे. यासंदर्भात मानसिंग वळवी यांनी त्यांच्या स्वत:च्या एक एकर शेतात प्रयोग केला. त्यातील यशानंतर हळूहळू त्यांनी आता ३५ एकर क्षेत्र भाड्याने घेतले. त्यात वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. विशेषत: भात, तूर, ज्वारीचे पीकं घेतली जात असून या सेंद्रीय धान्याला मागणीही वाढली आहे.मानसिंग वळवी यांचे प्रयोग पाहून गावातील अनेक शेतकरी आता सेंद्रीय शेतीचे प्रयोग करू लागले आहेत. त्यामुळे हे गाव प्रयोगशील गाव म्हणून जिल्ह्यात नावारुपास येवू पहात आहे. तांदूळ महोत्सवात या गावाच्या तांदुळाला विशेष मागणी असते.प्रयोगशील गाव... मानसिंग वळवी व त्यांच्या पाच सहकार्यांनी बचत गटाच्या माध्यमातून गावात दाळमिल, सेंद्रीय तांदूळ, गांडूळखत निर्मिती आणि सेंद्रीय शेतीचे प्रयोग सुरू केले आहेत. त्यांचा आदर्श घेत गावातील ४१ शेतकºयांनी सेंद्रीय शेतीचे प्रयोग यंदा राबविले आहेत. पर्यावरण आणि स्वच्छतेचा संदेश देत गावात स्वयंरोजगार आणि व्यवसायाला गती मिळाल्यामुळे गावात समृद्धीचा नवा मार्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे गावही बदलू लागले असून अनेकजण या गावातील प्रयोग पहाण्यासाठी व माहितीसाठी येत आहेत.