शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

शहादा-शिरपूर मार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा-शिरपूर मार्गावर पावसामुळे मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले असून वाहनांचे छोटे-मोठे  अपघात होत असल्याने हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : शहादा-शिरपूर मार्गावर पावसामुळे मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले असून वाहनांचे छोटे-मोठे  अपघात होत असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. दोन महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्च करुन या महामार्गाची डागडूजी करण्यात आली. परंतु पहिल्याच पावसात रस्त्याचा बोजवारा उडाला. या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन हे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित बुजविणे गरजेचे आहे.शहादा-शिरपूर या मार्गावर आधीच असलेल्या खड्डय़ांमुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. त्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने या मार्गाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. पावसामुळे मोठमोठे खड्डे तयार झाल्याने हे खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात जागोजागी  लहान-मोठे अपघात वाढले आहेत.  मात्र  सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वडाळी ते बामखेडा  या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील खड्डे पाहिले तर ‘रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता’ या प्रश्नाचे उत्तर देणेदेखील अवघड होते. या रस्त्यावरून वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते.  त्यात वाहनांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. तसेच या मार्गावर नियमित ये-जा कराणा:यांना विविध व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. या मार्गावर लहान-मोठे वाहनांसह अवजड वाहने, कंटेनर यांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात आहे. मात्र मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे अवजड वाहने निघण्यास अडचणी येत असल्याने जागोजागी वाहतुकीची कोंडी होऊन इतर वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. शहादा ते शिरपूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वर्षभरात ब:याचवेळा लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र महिना-दोन महिन्यात या मार्गाची अवस्था ‘जैसे थे’ होते. दुरुस्तीचे काम निकृष्ट प्रतीचे होत असल्याने पुन्हा खड्डे पडून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो, असा आरोप वाहनधारकांकडून होत आहे. या रस्त्याचे नूतनीकरण अथवा दुरुस्तीचे दज्रेदार काम झाले तर वाहनधारक या समस्येतून मुक्त होतील. गेल्या दोन महिन्यापूर्वीच लाखो रुपये खर्च करून या रस्त्याची डागडूजी करण्यात आली होती. मात्र अपेक्षित पाऊस नसतानाही काही दिवसातच खड्डे ‘जैसे थे’ होत होते. त्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची भर पडून रस्त्यांवरील खड्डय़ांचे आकार वाढल्याने सद्यस्थितीत तर या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित खड्डे बुजवून हा रस्ता वाहनधारकांसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी केली जात आहे. शहादा ते शिरपूर हा मार्ग 50 ते 55 किलोमीटर अंतराचा असून या मार्गावरुन नेहमी शालेय विद्यार्थी प्रवास करतात. खड्डय़ांमुळे या रस्त्यावर नेहमी लहान-मोठे अपघात होत असून मोठय़ा अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. संबंधित विभागाला रस्ता दुरूस्तीबद्दलची जाग येत नाही. अजून किती निष्पाप बळी जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया त्रस्त वाहनधारकांकडून व्यक्त होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या डागडूजीसाठी केव्हा मुहूर्त सापडेल, असा संतप्त सवालही केला जात आहे.