शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
3
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
4
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
5
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
6
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
7
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
8
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
9
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
10
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
11
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
12
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
13
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
14
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
15
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
16
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
17
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
18
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
19
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
20
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाचवीच्या वर्गांसह सहावी, सातवी व आठवीचे वर्ग बुधवार, २७ पासून सुरू झाले. शाळांमधील किलबिलाट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाचवीच्या वर्गांसह सहावी, सातवी व आठवीचे वर्ग बुधवार, २७ पासून सुरू झाले. शाळांमधील किलबिलाट पुन्हा कानावर आल्याने शाळांचा परिसर गजबजला. प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत आलेल्या अर्थात पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कुतूहल स्पष्ट दिसून येत होते. तर सहावी ते आठवीचे विद्यार्थी जुने सवंगडी भेटल्याने आनंदीत झाले होते. कोरोनाच्या भितीचा कुठलाही लवलेश विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. परंतु पालकांच्या मनातील भिती मात्र कायम होती. पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले. गेल्या आठ दिवसांपासून त्यासाठी तयारी सुरू होती. शाळा सॅनिटाईझ करण्यात आल्या. शिक्षकांच्या कोरोना चाचण्याही करण्यात येत असून ६० टक्के शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी उपस्थिती कमी होती. असे असले तरी येत्या दोन ते तीन दिवसात उपस्थिती वाढेल अशी अपेक्षा शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम यांनी व्यक्त केली. 

विद्यार्थ्यांची तपासणी शहरी भागातील शाळांसह ग्रामीण भागातील शाळांमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची थर्मलगनद्वारे ताप तर ॲाक्सीमिटरद्वारे शरिरातील ॲाक्सीजनची तपासणी करण्यात आली. मास्क सक्तीचा करण्यात आला होता.

एक दिवसाआड वर्ग भरविणार... विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या अनेक शाळा या एकदिवसा आड वर्ग भरविणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविता येणार आहेत. याशिवाय सलग एक ते पाच तासिका होणार असून मधली सुट्टी राहणार नाही

शिक्षण विभागाच्या आदेशानुसार कोरोना चाचणी केली. ती निगेटिव्ह आल्याने शाळेत आलो. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या. मनातील भिती दूर केली.-जी.व्ही.पाटील, शिक्षक.

पाचवीच्या वर्गात यंदा प्रवेश घेतला आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच शाळेत येण्यास मिळाल्याने आनंद झाला.          -मयुरेश जाधव,विद्यार्थी.शाळेचा पहिला दिवस व कोरोनाची भिती यामुळे आजच्या पहिल्या दिवशी मनात धाकधूक होती. परंतु शिक्षक व पालकांनी मनातील भिती दूर केली. -शारदा राजपूत, विद्यार्थीनी.

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली होती. येत्या काही दिवसात उपस्थिती वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. सर्व शाळांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. पालकांनी नि:संकोचपणे पाल्यांना शाळेत पाठवावे.                             -एम.व्ही.कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी.