शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाचवीच्या वर्गांसह सहावी, सातवी व आठवीचे वर्ग बुधवार, २७ पासून सुरू झाले. शाळांमधील किलबिलाट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाचवीच्या वर्गांसह सहावी, सातवी व आठवीचे वर्ग बुधवार, २७ पासून सुरू झाले. शाळांमधील किलबिलाट पुन्हा कानावर आल्याने शाळांचा परिसर गजबजला. प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत आलेल्या अर्थात पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कुतूहल स्पष्ट दिसून येत होते. तर सहावी ते आठवीचे विद्यार्थी जुने सवंगडी भेटल्याने आनंदीत झाले होते. कोरोनाच्या भितीचा कुठलाही लवलेश विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. परंतु पालकांच्या मनातील भिती मात्र कायम होती. पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले. गेल्या आठ दिवसांपासून त्यासाठी तयारी सुरू होती. शाळा सॅनिटाईझ करण्यात आल्या. शिक्षकांच्या कोरोना चाचण्याही करण्यात येत असून ६० टक्के शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी उपस्थिती कमी होती. असे असले तरी येत्या दोन ते तीन दिवसात उपस्थिती वाढेल अशी अपेक्षा शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम यांनी व्यक्त केली. 

विद्यार्थ्यांची तपासणी शहरी भागातील शाळांसह ग्रामीण भागातील शाळांमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची थर्मलगनद्वारे ताप तर ॲाक्सीमिटरद्वारे शरिरातील ॲाक्सीजनची तपासणी करण्यात आली. मास्क सक्तीचा करण्यात आला होता.

एक दिवसाआड वर्ग भरविणार... विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या अनेक शाळा या एकदिवसा आड वर्ग भरविणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविता येणार आहेत. याशिवाय सलग एक ते पाच तासिका होणार असून मधली सुट्टी राहणार नाही

शिक्षण विभागाच्या आदेशानुसार कोरोना चाचणी केली. ती निगेटिव्ह आल्याने शाळेत आलो. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या. मनातील भिती दूर केली.-जी.व्ही.पाटील, शिक्षक.

पाचवीच्या वर्गात यंदा प्रवेश घेतला आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच शाळेत येण्यास मिळाल्याने आनंद झाला.          -मयुरेश जाधव,विद्यार्थी.शाळेचा पहिला दिवस व कोरोनाची भिती यामुळे आजच्या पहिल्या दिवशी मनात धाकधूक होती. परंतु शिक्षक व पालकांनी मनातील भिती दूर केली. -शारदा राजपूत, विद्यार्थीनी.

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली होती. येत्या काही दिवसात उपस्थिती वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. सर्व शाळांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. पालकांनी नि:संकोचपणे पाल्यांना शाळेत पाठवावे.                             -एम.व्ही.कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी.