शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

ईटीआय मशीनच मिळत नसल्याने वाहकांकडून पुन्हा होऊ लागली पंचिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:36 IST

नंदुरबार आगारात २२७, शहादा २४०, नवापूर १८५ तर अक्कलकुवा आगारात २०० वाहक कामकाज करतात. या वाहकांकडून दिवसभरात जिल्ह्यातील बसेसचा ...

नंदुरबार आगारात २२७, शहादा २४०, नवापूर १८५ तर अक्कलकुवा आगारात २०० वाहक कामकाज करतात. या वाहकांकडून दिवसभरात जिल्ह्यातील बसेसचा ८० हजार किलोमीटरपर्यंत प्रवास करून आणला जातो. जिल्ह्यातील साधारण ५० हजार प्रवासी या बसेसमधून प्रवास करतात. यातून जिल्ह्याचे एसटीचे उत्पन्न हे साधारण ३५ लाखांच्या घरात आहे. हे उत्पन्न प्राप्त करण्यासाठी मेहनत करणाऱ्या वाहकांना सध्या ईटीआय मशीन त्रस्त करत असल्याचे केलेल्या पडताळणी दरम्यान दिसून आले. नंदुरबार आगारातील काही वाहकांसोबत संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, मशीनमध्ये तिकीट अडकल्यास ते बाहेर काढण्यात बराच वेळ जातो. काहींना तर मशीनच मिळत नसल्याने तिकीट पंच करून द्यावे लागते. जिल्ह्यातील चारही आगारात महामंडळाने दिलेले मशीनच खराब झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

नंदुरबार आगारातून दररोज ४८१ बस फेऱ्या करण्यात येतात. या बस फेऱ्यात ग्रामीण भागातील बसेसमध्ये १०० टक्के पंच करून तिकीट वाटप होत आहे. केवळ लांब पल्ल्याच्या बसेससाठी तिकीट मशीन दिले जात आहे. यातही तिकीट अडकल्यानंतर ते बाहेर काढण्यासाठी मेहनत करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

चारही आगारातून दररोज तक्रारींचा पाढा वाचला जात असल्याचे तेथील वाहतूक नियंत्रकांकडून सांगण्यात आले. यात प्रामुख्याने बॅटरी खराब होणे, तिकीट अडकणे, मशीन हँग होणे यासह विविध प्रकार होत आहेत. यातून मग मशीन बदलून देण्याऐवजी पंचिंग करून देण्याच्या सूचना करण्यात येत आहेत.

बॅटरी व मशीन हँग होण्याच्या तक्रारी ह्या गेल्या अनेक दिवसांपासून होत्या. महामंडळाकडून पर्यायी ईटीआय मशीनही उपलब्ध नसल्याने समस्या दिवसेंदिवस वाढून मॅन्यूअली तिकीट वाटप करण्याची वेळ वाहकांवर आली आहे. ­

एसटी कामगारांकडून पाठपुरावा सुरू

दरम्यान या समस्येबाबत एसटीच्या कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसाेबत संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. परंतु काही वाहकांनी सांगितले की, कामगार संघटना ईटीआय मशीनबाबत शासनासोबत चर्चा करत आहेत. त्यांच्याकडून लवकरच चांगल्या दर्जाचे मशीन मिळतील, अशी अपेक्षा आहे. यासाठी संघटनांकडून पाठपुरावाही सुरू आहे.

मशीनअभावी तिकीट काढणे वाहकांनाच अडचणीचे ठरत असून त्यांना कॅश कलेक्शनला समस्या येत असल्याचे सांगण्यात आले.

शहरी भागात गाडी घेऊन गेलो असताना, अचानक मशीन खराब झाले. परतीच्या प्रवासात तिकीट कसे काढून द्यावे ही अवस्था होती. शेवटी पर्याय म्हणून तिकिटे पंच करून देण्यास सुरुवात केली. इतरांसोबतही असे अनेक प्रकार घडले आहेत.

-वाहक, नंदुरबार आगार,

ग्रामीण भागात होणाऱ्या बस फेऱ्यांसाठी आता पंच केलेली तिकिटे देत आहे. मशीन खराब झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार कामकाज सुरू आहे. नवे मशीन आल्यावर त्यानुसार कामकाज करू.

-वाहक, नंदुरबार आगार.

गेल्या काही दिवसांपासून ईटीआय मशीनबाबत समस्या जाणवत आहेत. यातून मग वाहकांना सूचना केल्या आहेत. जुन्या पद्धतीने तिकीट वाटप करण्याचे कामकाज सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात ही स्थिती आहे. महामंडळाच्या सूचनांनुसार हे कामकाज सुरू आहे. येत्या काळात आगारांना नवीन मशीन देण्यात येतील, अशी शक्यता आहे. याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही.

-मनोज खैरनार,

व्यवस्थापक, नंदुरबार आगार