शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

ईटीआय मशीनच मिळत नसल्याने वाहकांकडून पुन्हा होऊ लागली पंचिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:36 AM

नंदुरबार आगारात २२७, शहादा २४०, नवापूर १८५ तर अक्कलकुवा आगारात २०० वाहक कामकाज करतात. या वाहकांकडून दिवसभरात जिल्ह्यातील बसेसचा ...

नंदुरबार आगारात २२७, शहादा २४०, नवापूर १८५ तर अक्कलकुवा आगारात २०० वाहक कामकाज करतात. या वाहकांकडून दिवसभरात जिल्ह्यातील बसेसचा ८० हजार किलोमीटरपर्यंत प्रवास करून आणला जातो. जिल्ह्यातील साधारण ५० हजार प्रवासी या बसेसमधून प्रवास करतात. यातून जिल्ह्याचे एसटीचे उत्पन्न हे साधारण ३५ लाखांच्या घरात आहे. हे उत्पन्न प्राप्त करण्यासाठी मेहनत करणाऱ्या वाहकांना सध्या ईटीआय मशीन त्रस्त करत असल्याचे केलेल्या पडताळणी दरम्यान दिसून आले. नंदुरबार आगारातील काही वाहकांसोबत संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, मशीनमध्ये तिकीट अडकल्यास ते बाहेर काढण्यात बराच वेळ जातो. काहींना तर मशीनच मिळत नसल्याने तिकीट पंच करून द्यावे लागते. जिल्ह्यातील चारही आगारात महामंडळाने दिलेले मशीनच खराब झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

नंदुरबार आगारातून दररोज ४८१ बस फेऱ्या करण्यात येतात. या बस फेऱ्यात ग्रामीण भागातील बसेसमध्ये १०० टक्के पंच करून तिकीट वाटप होत आहे. केवळ लांब पल्ल्याच्या बसेससाठी तिकीट मशीन दिले जात आहे. यातही तिकीट अडकल्यानंतर ते बाहेर काढण्यासाठी मेहनत करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

चारही आगारातून दररोज तक्रारींचा पाढा वाचला जात असल्याचे तेथील वाहतूक नियंत्रकांकडून सांगण्यात आले. यात प्रामुख्याने बॅटरी खराब होणे, तिकीट अडकणे, मशीन हँग होणे यासह विविध प्रकार होत आहेत. यातून मग मशीन बदलून देण्याऐवजी पंचिंग करून देण्याच्या सूचना करण्यात येत आहेत.

बॅटरी व मशीन हँग होण्याच्या तक्रारी ह्या गेल्या अनेक दिवसांपासून होत्या. महामंडळाकडून पर्यायी ईटीआय मशीनही उपलब्ध नसल्याने समस्या दिवसेंदिवस वाढून मॅन्यूअली तिकीट वाटप करण्याची वेळ वाहकांवर आली आहे. ­

एसटी कामगारांकडून पाठपुरावा सुरू

दरम्यान या समस्येबाबत एसटीच्या कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसाेबत संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. परंतु काही वाहकांनी सांगितले की, कामगार संघटना ईटीआय मशीनबाबत शासनासोबत चर्चा करत आहेत. त्यांच्याकडून लवकरच चांगल्या दर्जाचे मशीन मिळतील, अशी अपेक्षा आहे. यासाठी संघटनांकडून पाठपुरावाही सुरू आहे.

मशीनअभावी तिकीट काढणे वाहकांनाच अडचणीचे ठरत असून त्यांना कॅश कलेक्शनला समस्या येत असल्याचे सांगण्यात आले.

शहरी भागात गाडी घेऊन गेलो असताना, अचानक मशीन खराब झाले. परतीच्या प्रवासात तिकीट कसे काढून द्यावे ही अवस्था होती. शेवटी पर्याय म्हणून तिकिटे पंच करून देण्यास सुरुवात केली. इतरांसोबतही असे अनेक प्रकार घडले आहेत.

-वाहक, नंदुरबार आगार,

ग्रामीण भागात होणाऱ्या बस फेऱ्यांसाठी आता पंच केलेली तिकिटे देत आहे. मशीन खराब झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार कामकाज सुरू आहे. नवे मशीन आल्यावर त्यानुसार कामकाज करू.

-वाहक, नंदुरबार आगार.

गेल्या काही दिवसांपासून ईटीआय मशीनबाबत समस्या जाणवत आहेत. यातून मग वाहकांना सूचना केल्या आहेत. जुन्या पद्धतीने तिकीट वाटप करण्याचे कामकाज सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात ही स्थिती आहे. महामंडळाच्या सूचनांनुसार हे कामकाज सुरू आहे. येत्या काळात आगारांना नवीन मशीन देण्यात येतील, अशी शक्यता आहे. याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही.

-मनोज खैरनार,

व्यवस्थापक, नंदुरबार आगार