शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकात मिशन ‘क्लिनअप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रेल्वे आणि बसस्थानकात विशेष दक्षता घेतली जात आहे. रेल्वे स्थानकातील सर्वच ठिकाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रेल्वे आणि बसस्थानकात विशेष दक्षता घेतली जात आहे. रेल्वे स्थानकातील सर्वच ठिकाणी स्वच्छता केली जात आहे. रेल्वेच्या आरोग्य विभागाने बुधवारी येथे पहाणी करून एकुण स्थितीची माहिती घेतली. तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना सक्त सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, बसस्थानकात देखील स्वच्छतेच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे. सर्व बसेस नियमित स्वच्छ केल्या जात आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव हा सर्वात जास्त गर्दीच्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता गर्दी होणाºया रेल्वे आणि बसस्थानकांच्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. त्यादृष्टीने संबधीत विभाग कामाला लागला आहे.रेल्वे स्थानकात नियमित स्वच्छतेला महत्व दिले जात आहे. दिवसातून तीन वेळा स्वच्छता केली जात आहे. शिवाय प्रवासी सर्वाधिक ज्या ठिकाणी स्पर्श करतात अशा ठिकााणी सॅनिटायझरने स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करीत आहे. यात बसण्याचे बाक, पादचारी पूल, तिकीट खिडकी, खाद्य पदार्थाचे स्टॉल, पिण्याच्या पाण्याचे नळ, स्वच्छतागृह यांचा समावेश आहे. फलाट फार्मवर कचरा होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे.बुधवारपासून दिवसातून तीन वेळा स्वच्छता करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना विशिष्ट ड्रेस, मास्क, ग्लोव्हज दिले जात आहे. येणाºया व जाणाºया सर्व प्रवासी गाड्यांमध्ये देखील स्वच्छता केली जात आहे.आरोग्य व स्वच्छता विभागरेल्वेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने बुधवारी रेल्वे स्थानकात भेट देत स्वच्छतेच्या कामांची पहाणी केली. विविध खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर जावून तेथील पदार्थांचा दर्जा, स्वच्छता आणि खाद्यपदार्थ बनविणाºयांच्या आरोग्याची माहिती घेतली. तसेच काही सुचना देखील दिल्या. यावेळी स्टेशन प्रबंधक वसंतलाल मंडल, उपस्टेशन अधीक्षक प्रमोद ठाकुर यांच्यासह रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य जवाहर जैन आदी उपस्थित होते.प्रवासी संख्या रोडावलीरेल्वेची प्रवासी संख्या ३० टक्के रोडावली आहे. याशिवाय स्थानकावर येणाºयांची संख्या देखील कमी झाली आहे. गर्दीवर नियंत्रणासाठी रेल्वेने फ्लॅटफॉर्म तिकिट वाढविले आहे. त्याचाही परिणाम दिसून येत आहे.बसस्थाकावरही दक्षताबसस्थानकातही दक्षता घेतली जात आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा, अक्कलकुवा येथे स्वच्छतेवर भर दिला जात आहे. सर्वच एस.टी.बसेसची नियमित स्वच्छता केली जात आहे. बसस्थानक आवारातील कचºयाची वेळोवेळी विल्हेवाट लावली जात आहे. प्रवाशांना ध्वनीक्षेपकाद्वारे कोरोना आजाराविषयी आणि त्याविषयी दक्षता बाळगण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत.रेल्वेचा कचरा आतापर्यंत पालिकेच्या घंटागाड्यांमध्ये भरला जात होता. रेल्वेच्या स्वच्छता विभागाने गोळा केलेला सर्व कचरा हा स्थानकाबाहेर असलेल्या कचरा कुंडीत टाकला जात होता. तेथून पालिकेचे घंटागाडीवरील कर्मचारी दररोज सकाळी नियमितपणे हा कचरा उचलत होते. परंतु सध्या रेल्वे स्थानक इमारतीचे काम सुरू आहे. या ठिकाणची कचराकुंडी काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे गोळा केलेला कचरा प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये भरून ते स्थानकाच्या बाहेर ठेवले जात आहे. तो कचरा घंटागाडी उचलत नसल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणने आहे. स्टेशन प्रबंधक यांनी याबाबत पालिकेला तीन वेळा पत्र दिले आहे. परंतु पालिकेच्या म्हणण्यानुसार पालिकेची जबाबदारी स्थानकातील कचरा उचलण्याच नाही, केवळ स्थानकाबाहेरील कचरा कुंडीमधील कचरा उचलण्याची आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या भिंतीलगत कचरा भरलेल्या गोण्यांचा ढिग पडला आहे.