शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

एक मीटर भूजल वाढीने यंदा सुकाळ शहरे व खेड्यातून बाद होणार दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 12:51 PM

 भूषण रामराजे   लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वर्षभर कोरोनाच्या भीतीत जगणाऱ्या जिल्हावासीयांना यंदा पाणीटंचाई भोगावी लागणार नसल्याचा निर्वाळा भूजल ...

 भूषण रामराजे  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वर्षभर कोरोनाच्या भीतीत जगणाऱ्या जिल्हावासीयांना यंदा पाणीटंचाई भोगावी लागणार नसल्याचा निर्वाळा भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे.  विभागाने ऑक्टोबर अखेरीस केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्याची भूजल पातळी ३ मीटरवर स्थिर असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा भूजल पातळी एक मीटरने वाढली आहे. यामुळे जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई भेडसावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुसळधार पाऊस पडूनही जिल्ह्यातील भूजल पातळीत घट येत असल्याने २०१८ पर्यंत जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यातील विविध भागात गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होत होती. परंतु गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात पावसाने दिलेली १०० टक्के हजेरी व जलसंधारणाची कामे यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत एक मीटर भूजल स्थिर असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. विभागाने नंदुरबार तालुक्यातील १३, नवापूर १५, तळोदा ३, शहादा ९, अक्कलकुवा ६ तर धडगाव तालुक्यातील ४ ठिकाणी विहिरी अधिग्रहीत करून त्यांचे सर्वेक्षण केले होते. यातून सप्टेंबर अखेरीस जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यात ३.०७ मीटर, नवापूर २.१३, तळोदा ५.५७, शहादा ५.०७, अक्कलकुवा ३.५७ तर धडगाव तालुक्यात १.८० मीटरवर भूजल पातळी स्थिर असल्याचे समोर आले आहे. विभागाने निर्धारित केलेल्या ५० पैकी केवळ १४ विहिरींच्या पाणी पातळीत सर्वेक्षणादरम्यान घट आल्याचे, तर विहिरींची पातळी वाढल्याचे समोर आले होते. आजअखेरीस जिल्ह्यात  भूजल पातळी ही १.१६ मीटरने वाढली असल्याची माहिती आहे.

जिल्ह्याची भूजल पातळी एकमीटरने वाढली असल्याने चांगले संकेत मिळाले आहेत. जिल्ह्यात उदरात मुबलक पाणीसाठा आहे. परंतू या पाण्याचा योग्य पद्धतीने उपसा करणे गरजेचे आहे. यामुळे हे पाणी येत्या काळात टिकेल. जिल्ह्यात झालेली जलसंधारणाची कामे आणि पावसाचे पाणी जमिनीत गेल्याने पाणी पातळी वाढली आहे. नागरीकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जिल्ह्यात यंदा पाणीटंचाई राहणार नाही. -आर.ओ.भगमार, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण विभाग, नंदुरबार.