शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

फळपीक व भाजीपाला वाहतूक करता येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:49 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केळी, पपई, टरबूज, भाजीपाला सारखी पिके तयार असून अधिक काळ शेतावर राहिल्यास संपूर्ण पिकाची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केळी, पपई, टरबूज, भाजीपाला सारखी पिके तयार असून अधिक काळ शेतावर राहिल्यास संपूर्ण पिकाची नासाडी होऊ शकते. त्यामुळे पिकांच्या वाहतुकीस जिल्हाधिकाऱ्यांनी परवाणगी दिली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती.या फळ पिकांचे व शेतकºयांचे प्रचंड आर्थिक नुकसान लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यात शेतकºयाच्या एका शिष्टमंडळाने भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची भेट घेवून निवेदन दिले. केळी, पपई, टरबूज व भाजीपाला या पिकांना भारतात कुठेही विक्री करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी केली. जिल्हाधिकारी भारुड यांनी शेतकºयांना त्यांच्या शेतातील मान इतर राज्यात विक्रीस परवानगी देण्याचे आदेश तात्काळ दिले.शेतकºयांनी केळी पपई टरबूज भाजीपाला सारखी पिके परराज्यात विक्री करावी तसेच याकामी तालुका कृषी अधिकाºयांची रितसर परवानगी पत्र घ्यावे असेही आवाहन जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले आहे. याप्रसंगी भाजपा सरचिटणीस निलेश माळी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील शेतकरी प्रतिनिधी छोटूभाई पाटील आदी उपस्थित होते.