शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या बेपर्वाईने महाराष्ट्राच्या पाच लाख कोंबड्यांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:11 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र प्रशासनाने बर्ड फ्लू बाबत गुजरात प्रशासनाला सतर्क करुनही त्याची तत्काळ दखल ...

रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र प्रशासनाने बर्ड फ्लू बाबत गुजरात प्रशासनाला सतर्क करुनही त्याची तत्काळ दखल न घेतल्याने आता त्याचा संभाव्य धोक्यापासून महाराष्ट्राला सतर्क राहावे लागणार आहे. सीमेलगतच्या पाच पाेल्ट्रींचा अहवाल निगेटीव्ह आला असला तरी गुजरातच्या हद्दीतील पोल्ट्रींचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने सुमारे पाच लाख कोंबड्यांना त्याचा धोका निर्माण झाला आहे.महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेलगत माेठ्या प्रमाणावर पोल्ट्री व्यवसाय चालतो. या दोन्ही राज्यात तीन किलोमीटरच्या परिसरात ३० पेक्षाही अधिक पोल्ट्री असून, त्यात महाराष्ट्राच्या हद्दीतील २७ आहेत. तर गुजरातच्या हद्दीत तीन आहे. पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांच्या अचानक मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येताच महाराष्ट्र प्रशासन सतर्क झाले व उपाययोजना सुरू केल्या. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. त्याचे अहवाल पॉझिटीव्ह येताच तत्काळ कोंबड्या व अंडी शास्त्राेक्त पद्धतीने नष्ट करण्यास सुरूवात केली. त्यासाठी विविध जिल्ह्यातील सुमारे ३०० पथक कार्यरत होते. हा अहवाल ज्या दिवशी मिळाला त्याच दिवशी जिल्हा प्रशासनाने शेजारील डांग व तापी जिल्हा प्रशासनाला कळवून सतर्कतेबाबत सूचना केल्या होत्या. मात्र गुजरात प्रशासनाने सुरूवातीला बेपर्वाईची भूमिका घेतली. एवढेच नव्हे तर गुजरातमधील पोल्ट्री फार्ममधून पक्षांची ने-आण होवू नये याची खबरदारी घेण्यासाठी तेथील पोल्ट्रीवर महाराष्ट्राचाच पोलीस बंदोबस्ताला ठेवण्यात आले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर गुजरात प्रशासनाला जाग आली आणि तेथील पोल्ट्रीवर गुजरातचे पोलीस बंदोबस्ताला ठेवले. त्यानंतर तपासणीसाठी नमुनेही घेण्यात आले. इकडे महाराष्ट्रातील २२ पोल्ट्रीतील अहवाल पॉझीटिव्ह आल्याने तेथील सुमारे पावणेसहा लाख कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या. उर्वरित पाच पोल्ट्रींचे अहवाल निगेटीव्ह आल्याने तब्बल १० दिवसांपासून अहोरात्र काम करणाऱ्या यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. पक्षांची किलिंग थांबविण्यात आली आणि विविध जिल्ह्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांनाही विश्रांती देण्यात आली. मात्र महाराष्ट्रातील किलिंग थांबवताच गुजरातमधील ‘त्या’ पोल्ट्रींचे अहवाल पॉझिटीव्ह आले. विशेष म्हणजे तेथील पोल्ट्रीत एच ५, एन १ हा मनुष्यालाही धोका पोहचवू शकणाऱ्या विषाणू निष्पन्न झाला. त्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडून विश्रांतीचा मुडमध्ये आलेल्या महाराष्ट्र प्रशासनाची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे. कारण गुजरातमधील तो पोल्ट्री फार्म हाकेच्या अंतरावरच असून, ज्या पाच पोल्ट्रीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तेथील किलिंग थांबविण्यात आले होते. त्या पोल्ट्री जवळच असल्याने तेथील सुमारे पाच लाख कोंबड्यांना पुन्हा गुजरातच्या या विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पुन्हा खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत.