शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

जीपीएस प्रणाली बंद असल्याने वनपट्ट्यांची मोजणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 13:01 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  शासनाची जीपीएस प्राणालीची साईट गेल्या तीन वर्षांपासून बंद झाल्यामुळे अतिक्रमित वनपट्टे धारकांच्या जमिनीची मोजणीदेखील ...

 लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  शासनाची जीपीएस प्राणालीची साईट गेल्या तीन वर्षांपासून बंद झाल्यामुळे अतिक्रमित वनपट्टे धारकांच्या जमिनीची मोजणीदेखील रखडली आहे. तळोदा तालुक्यातील साधारण एक हजार ६०० अतिक्रमण धारकांना आपल्या हक्काच्या सातबाऱ्याची प्रतिक्षाच करावी लागत आहे. हे वनपट्टेधारक मोजणीसाठी सातत्याने तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. परंतु त्यांची बोळवणच केली जात आहे. निदान याप्रकरणी जिल्हा प्रशासनानेच वरिष्ठांशी संवाद साधून हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा, अशी मागणी आहे.तळोदा तालुक्यातील लक्कडकोट, गढीकोठडा, रापापूर, चौगाव खुर्द, वाल्हेरी, माळखुर्द, मणिबेली, केवलापाणी, रावला पाणी, कोठार, बंधारा, अलवान, राणीपूर, वरपाडा, तयाचापळा, ढेकाटी, धजापाणी, बोरवण आदी गावांमधील वनजमीनधारक शेतकरी १९८० पासून वनजमीन खेडत होते. गेल्या ३५ वर्षांच्या शासना विरोधातील लढ्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने २०१५ मध्ये त्यांना या जमिनी मिळाल्या आहेत. शिवाय पुढील कार्यवाही केल्यानंतर शासनाने त्यांना दोन वर्षापूर्वीच जमिनीचा ताबा पावत्यादेखील दिल्या आहेत. परंतु त्यांच्या जमिनीची जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून मोजणी होत नसल्यामुळे त्यांचा सातबारादेखील आजतागायत रखडला आहे. या प्रणालीची साईट पुण्यामधूनफेब्रुवारी २०१८ पासून बंद करण्यात आली आहे. साहजिकच तळोदा तालुक्यातील साधारण एक हजार ६०० वनजमीन पट्टेधारकांना त्याचा फटका बसला आहे. सातबाऱ्यासाठीते गेल्या अडीच वर्षांपासून महसूल प्रशासनाकडे थेटे घालत आहेत. गेल्या आठवड्यात सुद्धाताबाऱ्यासाठीकाही शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनास साकडे घातले  होते.  मात्र वरूनच साईट बंद असल्यामुळे माेजणी करता येत नसल्याचे प्रशासनाने सांगितले होते. वास्तविक एक नव्हे तब्बल तीन वर्षांपासून जीपीएस प्रणालीची साईट पुण्याहून बंद झालेली आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी ठोस प्रयत्न करणे वरिष्ठ प्रशासनाची जबाबदारी असताना या प्रकरणी प्रशासनाने उदासिन भूमिका घेतल्याने वनअतिक्रमण धारक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनीही मौन धारण केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सरकारनेच आम्हास ताबा पावती दिली आहे. मग जपीएस मोजणीसाठी का? अडवणुकीचे धोरण अवलंबविली आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. निदान जिल्हा प्रशासनाने तरी वरिष्ठ महसूल प्रशासनाशी संवाद साधून हा रखडलेला प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा शेतकरी या विरोधात तीव्र आंदोलन छेडतील.

गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून आम्ही वनजमीन खेडत असलो तरी त्याचा सातबारा आमच्या जवळ नसल्यामुळे कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका दाद देत नाही. आम्ही शासनाच्या ताबा पावत्या बँक प्रशासनाला दाखवतो तेव्हा सातबारा द्या, असे सांगितले जाते. त्यामुळे सातबाऱ्या ऐवजी कर्जासाठी बँका दाद देत नाही. इकडे महसूल प्रशासन ताबा पावत्यांवर पीक कर्ज देण्याचा नियम आहे. या दोन्ही यंत्रणांच्या समन्वयअभावी वनजमीन धारक शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या बँक कर्ज प्रकरणी लीड बँकेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सातबाऱ्याअभावी आदिवासी विकास विभागाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

वनपट्ट्यांसाठी शासनाविरोधात ३५ वर्षाच्या संघर्षानंतर जमीन मिळाली आहे. ताबा पावतीही दिली आहे. परंतु जीपीएस मोजणीचा   खोळंबा घेतला आहे. मोजणी करून देण्यासाठी सतत थेटे घालतो आहे. परंतु दाद दिली जात नाही. जिल्हा प्रशासनाने यातून मार्ग काढून आमचा हा प्रश्न मार्गी लावावा.        -मानसिंग कालू पाडवी,     वनजमीनधारक, शेतकरी,     लक्कडकोट, ता.तळोदा