शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणाचा थाट, परंतु कर्मचाऱ्यांनीच फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST

मनोज शेलार कोरोना लसीकरणाला अखेर सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य विभागातील अर्थात कोरोनासाठी फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही ...

मनोज शेलार

कोरोना लसीकरणाला अखेर सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य विभागातील अर्थात कोरोनासाठी फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस दिली जात आहे. दोन दिवसांच्या लसीकरणात ८०० पैकी केवळ ५५० कर्मचाऱ्यांनी ही लस टोचून घेतली. त्याची टक्केवारी ६८ टक्केपर्यंतच गेली आहे. लसीकरणासंदर्भात आरोग्य कर्मचारीच उदासीन असताना सर्वसामान्य नागरिक लसीकरणासाठी पुढे येतील का? हा प्रश्न आता उभा राहण्याची शक्यता आहे. लसीकरणाची केवळ भीती हेच कारण पुढे येत आहे. कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी व जास्तीत जास्त लसीकरणासाठी ठोस उपाययोजना होणे आवश्यक ठरणार आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीपासूनच आटोक्यात आहे. सुरुवातीचे दोन महिने तर उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी रुग्णसंख्या असलेला नंदुरबार जिल्हा होता. कोरोनासंदर्भात उपाययोजनेसाठी नंदुरबार रोल मॅाडेल ठरू लागला होता. नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा बेफिकीरपणा नडला आणि कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. आजच्या स्थितीत जिल्ह्यात साडेआठ हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या गेली असून मृतांची संख्या २०० च्या घरात पोहचली आहे. दिवाळीनंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. शेवटी जिल्हा प्रशासनाला कोरोना रुग्णांसाठीच्या होम आयशोलेशनची सुविधा बंद करणे आणि विवाह समारंभ आणि अंत्ययात्रा यांच्यावर बंधने घालावी लागली आहेत. अशा काळातच कोरोना लस उपलब्ध झाली आणि जनतेला हायसे वाटले. लसीकरणासाठी जिल्ह्यात फ्रंटलाईन वर्करची नोंदणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात १० हजार ८५७ जणांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली. त्यासाठी एकूण १२ हजार ४१० डोस प्राप्त झाले आहेत. चार केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. आठवड्यातून चार दिवस प्रत्येकी एका केंद्रावर १०० असे चार केंद्रांवर ४०० जणांना लस दिली जाणार आहे. शनिवार व मंगळवार असे दोन दिवस लस देण्यात आली. या दोन्ही दिवशी सरासरी ६६ ते ६८ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली. बाकी कर्मचारी फिरकलेदेखील नाहीत.

लस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कर्मचारी लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याची स्थिती आहे. आधीच नोंदणी करताना प्रशासनाने दुर्धर आजार, गर्भवती, स्तनदामाता, ज्याची इम्युनिटी पॅावर कमी आहे, अशा लोकांना वगळले आहे. असे असताना इतर कर्मचारी लस घेण्यासाठी पुढे का येत नाहीत, हा प्रश्न आहे. वास्तविक कर्मचाऱ्यांमधील भीती घालविण्यासाठी जिल्हास्तरावर स्वत: जिल्हा शल्यचिकित्सकांनी पहिली लस घेतली. इतर केंद्रांवरदेखील त्या त्या प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी आधी लस घेतली. वास्तविक दोन्ही दिवशी अर्थात आतापर्यंत लस घेतलेल्या ५५० कर्मचाऱ्यांपैकी कुणालाही कसलाही त्रास झालेला नाही. असे असतानाही कर्मचारी लस घेण्यासाठी टाळाटाळ का करीत आहेत, हा प्रश्न उपस्थित होत आहे. लसीकरणानंतर त्रास होण्याच्या राज्यात व देशात अगदीच तुरळक घटना घडलेल्या आहेत. ज्यांना त्रास झाला तेदेखील लागलीच बरे झालेले आहेत. जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी भीतीपोटी लस घेत नसल्याचे खासगीत सांगितले आहे. लसीकरण पूर्णपणे यशस्वी होईल. त्यानंतरच आपण लस घेणार असल्याचे एका कर्मचाऱ्याने स्पष्ट केले. भीतीच्या अशा माऊथ टू माऊथ पब्लिसिटीमुळे लसीकरण ७० टक्क्यांपेक्षा पुढे जाऊ शकले नसल्याची स्थिती आहे.

वास्तविक आरोग्य कर्मचारी स्वत:हून लस घेण्यासाठी पुढे आले तर दुसरे नागरिक लस घेण्यासाठी पुढे येतील. यासाठी प्रशासनाने आवाहन करणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला आवश्यकतेपेक्षा अधिक लसींचे डोज मिळालेले आहेत.

एकूणच कोरोनाच्या महाभंयकर पर्वातून सर्वचजण गेले आहेत. आता लसीकरणाच्या माध्यमातून या आजाराला दूर पळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शास्त्रज्ञांनी अथक परिश्रमातून लस तयार केली आहे. त्यांचे दावे आणि लोकांना केलेल्या आवाहनालाही तरी प्रतिसाद देऊन लसीकरण १०० टक्के करून घेणे आवश्यक आहे. किमान पहिला टप्पा यशस्वी झाला तर पुढच्या टप्प्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू शकतो याचेही भान प्रशासन आणि लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनी ठेवणे आवश्यक आहे.