शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

दुसऱ्या दिवशीही शाळेकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 11:53 AM

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शाळा सुरू झाल्या, परंतु ग्रामिण भागातून शहरी भागात येण्यासाठी प्रवासी वाहनेच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शाळा सुरू झाल्या, परंतु ग्रामिण भागातून शहरी भागात येण्यासाठी प्रवासी वाहनेच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भिती आहे. यामुळे विद्यार्थी उपस्थितीवर देखील परिणाम होत आहे. शाळांकडून पालकांचे हमीपत्र भरले जात असून त्यात पालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर पाल्याला पाठवीत असल्याचे नमुद केले आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी देखील विद्यार्थी उपस्थिती अत्यल्पच राहिली. शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने विचार केलेला नाही. शहरी भागातील किंवा जेथे शाळा आहे तेथील स्थानिक विद्यार्थी शाळेत जाऊ शकतील, परंतु ग्रामिण तसेच लांबवरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र परवड होत आहे. ग्रामिण भागातील एस.टी.बससेवा अद्याप सुरू झालेली नाही. मानव विकास मिशनच्या बसेस सुरू करण्याबाबतही अद्याप नियोजन नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ॲानलाईन शिक्षणानंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले. जिल्ह्यात या वर्गातील तब्बल ७२ हजार ६०६ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याचे आवाहन शाळांनी सोशलमिडिया तसेच वैयक्तीकरित्या दूरध्वनी करून केले. परंतु पहिल्या दिवशी १५ टक्के      विद्यार्थी देखील उपस्थित राहू शकले नाहीत. दुस-या दिवशीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. पहिल्या दिवशी जेवढ्या शाळा उघडल्या  तेवढ्याच शाळा दुस-या दिवशीही सुरू झाल्या होत्या. अप-डाऊनचे हालशहरी भागात किंवा शाळेपासून दूर अंतरावर राहणार-या विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी प्रवासी वाहन उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. दररोज खाजगी वाहनाने येणे व जाणे गरीब कुटूंबातील विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. शिवाय असे वाहने वेळेवर उपलब्ध होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.विद्यार्थीनींसाठी मानव विकास मिशनच्या बसेस सुरू करण्यासंदर्भात देखील अद्याप काहीही नियोजन झालेले नाही. जर ग्रामिण भागात एस.टी.सेवा सुरू झालीच तर विद्यार्थी कोरोनाविषयक किती आणि कशी काळजी घेऊ शकतील हा देखील प्रश्नच आहे. त्यामुळे पालक वर्ग धास्तावला आहे. हमीपत्राबाबत नाराजीअनेक शाळा पालकांचे हमीपत्र भरून घेत आहेत. हमीपत्रातील मजकुराविषयी मात्र अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर पाल्याला शाळेत पाठवत असल्याचे त्यात नमुद आहे. शाळांनी व प्रशासनानेही याबाबत जबाबदारी स्विकारावी अशी अपेक्षा काही पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे देखील अनेक पालक आपल्या पाल्यांना अद्यापही शाळेत पाठविण्याबाबत राजी होत नसल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थी उपस्थिती न वाढण्याचे ते देखील एक कारण असल्याचे बोलले जात आहे. 

   ७२ हजार विद्यार्थी... जिल्ह्यात नववी ते १२ वीचे एकुण ७२ हजार ६०६ विद्यार्थी आहेत.  पहिल्या दिवशी अवघे ४.२ टक्के तर दुस-या दिवशी हे प्रमाण ८ टक्केपर्यंत गेले होते.  ग्रामिण भागातून शहरी भागात शाळेत येणा-या विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्यासाठी एस.टी.बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. 

  •    शिक्षकेतरही पॅाझिटिव्ह
  •  नववी ते १२ वीला शिकविणा-या शिक्षकांची संख्या ४,१४१ आहे. त्यापैकी ३,०४२ शिक्षकांची स्वॅब तपासणी झाली. त्यात २० शिक्षक पॅाझिटिव्ह आले आहेत.
  •  शिक्षकेतर कर्मचा-यांची संख्या १,१५८ आहे. त्यापैकी ३१२ जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यात २ जण पॅाझिटिव्ह निघाले. त्यांची टक्केवारी ०१ टक्के आहे.
  • २५ टक्के शिक्षकांची चाचणी बाकी : चाचणी करून घेणा-या शिक्षकांची टक्केवारी ७३.५ टक्के आहे तर त्यातील पॅाझिटिव्ह आलेल्या शिक्षकांची टक्केवारी ०.७ टक्के आहे.