शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
4
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
6
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
7
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
8
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
9
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
10
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
11
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
12
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
13
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
14
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
15
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
16
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
17
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
18
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
19
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
20
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महिला सक्षमीकरणावर भर देण्याचे तिन्ही खासदारांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 11:59 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  उत्तर महाराष्ट्रातील तीन महिला खासदारांच्या उपस्थितीत झालेली भाजपच्या बैठकीत पक्ष संघटन वाढविणे, महिला सक्षमीकरण ...

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  उत्तर महाराष्ट्रातील तीन महिला खासदारांच्या उपस्थितीत झालेली भाजपच्या बैठकीत पक्ष संघटन वाढविणे, महिला सक्षमीकरण यावर भर देण्यात आला. राज्य सरकारचे विविध आघाडींवरील अपयश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनमानसात पोहचावे असेही आवाहन खासदारांनी केले. 
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा खासदार डॅा. भारती पवार, पक्षाच्या राष्ट्रीय   प्रवक्ता खासदार डॅा.हिना गावीत, खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिन्ही खासदारांनी पक्ष वाढीसाठी व संघटनासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. 
राज्य सरकार एक वर्षात विविध आघाडींवर सपशेल अपयशी ठरले आहे. जनमानसात नाराजीची भावना आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सामान्यांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न ऐकुण घेत सोडवावे असे आवाहन त्यांनी केले. महिला सक्षमीकरणावर खासदार डॅा. भारती पवार, डॅा.हिना गावीत, रक्षा खडसे यांनी भर दिला. महिला अत्याचाराच्या घटना राज्यात गेल्या वर्षभरात वाढल्या   आहेत. 
त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे का? हा प्रश्न पडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पक्षाने महिला सक्षमीकरणावर भर देण्याचे ठरविले असून त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील महिला आघाडी देखील अधीक सक्षमपणे काम करावे. महिलांचे प्रश्न सोडवावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील पक्ष संघटन याचा आढावा घेतला. तिन्ही खासदार एकत्र येण्याचा हा पहिलाच प्रसंग असून तिघांची वेगवेगळ्या आघाडींवर निवड झाल्याने ती एक गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तिन्ही खासदारांचा सत्कार चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पक्षाचे महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित  होत्या. 

िल्ली येथे असल्यावर महिला खासदारांमध्ये खासदार डॅा.हिना गावीत, खासदार रक्षा खडसे, खासदार डॅा. भारती पवार, खासदार डॅा.प्रितम मुंडे या एकत्रच राहतात. त्यांच्या मैत्रीची चर्चा दिल्लीतही असते. आज यापैकी तीन मैत्रीणी नंदुरबारात एकत्र आल्या. त्यामुळे त्यांच्यात चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. आपल्या भाषणात देखील त्यांनी दिल्लीतील काही अनुभव सांगितले. पुढील वेळी खासदार डॅा.प्रितम मुंडे यांनाही आणून मैत्रीणींचे वर्तूळ पुर्ण केली जाईल अशी अपेक्षा विजय चौधरी यांनी व्यक्त केली.