शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
3
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
5
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
6
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
7
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
8
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
9
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
10
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
11
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
12
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
13
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
14
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
15
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
16
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
17
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
18
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
19
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
20
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

नांदेड जिल्ह्यातील १४ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 5:22 PM

बिलोली, लोहा, हदगाव, किनवट, धर्माबाद आणि नायगाव तालुक्यांतील मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

नांदेड : जिल्ह्यात मुखेड, देगलूर आणि उमरी तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्यानंतर आणखी १४ मंडळांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून बिलोली, लोहा, हदगाव, किनवट, धर्माबाद आणि नायगाव तालुक्यांतील मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यात यापूर्वी १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर आणि उमरी या तीन तालुक्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला होता. राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्येही जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले होते. या कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अशा मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्याचा निर्णय ६ नोव्हेंबर रोजी राज्य शासनाने घेतला आहे.

बिलोली तालुक्यातील बिलोली, सगरोळी, कुंडलवाडी, आदमपूर, लोहा तालुक्यांतील लोहा, हदगाव तालुक्यातील मनाठा, किनवट तालुक्यातील इस्लापूर, जलधारा, शिवणी, धर्माबाद तालुक्यातील करखेली, जारीकोट आणि नायगाव तालुक्यातील कुंटूर, नरसी व मांजरम या महसुली मंडळात मंगळवारी दुष्काळ घोषित करण्यात आला. 

मुखेड, उमरी आणि देगलूर या तीन तालुक्यांसह उपरोक्त १४ मंडळांत दुष्काळ घोषित केल्याने महसूल मंडळात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या वीज कृषिपंपाची जोडणी खंडित न करणे अशा सवलती मिळणार आहेत. 

टॅग्स :droughtदुष्काळState Governmentराज्य सरकारagricultureशेतीFarmerशेतकरी