शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा कंपन्या मालामाल, ६१३ कोटी भरले, मिळणार ९८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:18 IST

नांदेड जिल्ह्यातील नऊ लाख ५५ हजार ८०० शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता. २०२० खरिपामध्ये व बहुतेक ...

नांदेड जिल्ह्यातील नऊ लाख ५५ हजार ८०० शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता. २०२० खरिपामध्ये व बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर या पिकांना संरक्षण घेतले; परंतु खरिपामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत व काढणीपश्चात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सामुदायिक पंचनामे करण्याची शेतकऱ्यांच्या वतीने मागणी केली गेली होती. तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व विमा कंपनीकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग व तांत्रिक कर्मचारी यांमुळे ही रास्त मागणी शेतकऱ्यांनी केली होती; परंतु जिल्हा प्रशासनाने ती नाकारली व वैयक्तिक पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केला गेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये काढणीपश्चात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे; परंतु ती नाकारून नांदेड जिल्ह्याला केवळ नुकसान भरपाईपोटी १३४ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील जवळपास साडेनऊ लाख शेतकऱ्यांनी ४४ कोटी ६८ लाख रुपये विमा हप्ता भरला आहे. त्यापोटी राज्य सरकारने २८४ कोटी ४३ लाख ८३००० व केंद्र सरकारने तेवढेच म्हणजे २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार अनुदानापोटी हप्ता भरला आहे, असा एकूण ६१३ कोटी विमा हप्ता भरला आहे. त्यात शेतकरी एका हेक्टरला ९०० रुपये विमा हप्ता भरतो व त्याला कव्हर ४५ हजार रुपयांचे असते. नांदेड जिल्ह्यातील एकूण विमाधारकांपैकी ९० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन हे पीक फिरल्यामुळे ९० टक्के लोकांनी सोयाबीनचा विमा काढलेला आहे. या एका हेक्‍टरसाठी केंद्र सरकार सहा हजार तीनशे रुपये व राज्य सरकार सहा हजार तीनशे रुपये, असे अंदाजे जवळपास १२ हजार ६०० रुपये देते. परंतु, पीक विमा कंपनी शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांना योग्य परतावा करीत नाही.

नांदेड जिल्ह्यातील आपत्ती व काढणीपश्‍चात पाऊस या कारणास्तव ८२ हजार शेतकऱ्यांना ७५ कोटी ८४ लाख रुपये विमा मिळाला. तसेच ३९ हजार शेतकऱ्यांना २२ कोटी रुपये विमा मिळाला आहे, असे एकूण नांदेड जिल्ह्यातील एक लाख २१ हजार ६०२ शेतकऱ्यांना आतापर्यंत ९७ कोटी ९१ लाख एवढी नुकसान भरपाईपोटी विम्याची रक्कम मिळालेली आहे.