शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दंगेखोरांची संपत्ती विकून नुकसान भरपाई वसूल करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By दयानंद पाईकराव | Updated: March 22, 2025 15:15 IST

नुकसान भरपाई शासन दंगेखोरांची संपत्ती विकून वसूल करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नागपूर : नागपूर हे शांत शहर आहे. १९९२ नंतर शहरात कधीच दंगल घडली नाही. त्यामुळे १७ मार्चला नागपुरात घडलेली दंगल दुर्देवी आहे. या दंगलीत अनेकांचे नुकसान झाले असून त्यांना आगामी चार दिवसात त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. परंतु ही नुकसान भरपाई शासन दंगेखोरांची संपत्ती विकून वसूल करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शनिवारी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल, पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, महसुलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आमदार कृष्णा खोपडे आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून दंगलीचा आढावा घेतला. बैठकीनंतर पोलिस भवनातील ऑडिटोरियममध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर सकाळी जाळल्यानंतर काही जणांनी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल करून घेतले. मात्र, कुराणची आयत लिहिलेची चार जाळल्याचा भ्रम करून सोशल मिडियावर अपप्रचार करण्यात आला. त्यामुळे सायंकाळी जमावाने तोडफोड सुरु केली, नागरिकांची वाहने पेटविली. पोलिस आणि नागरिकांवर हल्ला देखिल केला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या, प्रतिबंधात्मक कारवाई व सर्व प्रकारच्या उपाययोजना करून चार ते पाच तासात दंगलीवर नियंत्रण मिळविले. पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहून आतापर्यंत १०४ जणांना अटक केली आहे. यात ९२ आरोपी आणि १२ विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. आणखी सीसीटीव्ही फुटेज तपासून अखेरच्या दंगलखोराला अटक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

सोशल मीडियावर अप्रचार करणारे सहआरोपी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सोशल मीडियावर अपप्रचार केल्यामुळे ही दंगल भडकली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट व्हायरल करून अपप्रचार करणाऱ्यांना सहआरोपी करण्यात येणार आहे. आतापर्यंत असामाजिक तत्वांनी ६८ पोस्ट टाकून त्या डिलीट केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

तपासानंतर कळणार हात कुणाचा, टप्प्याटप्प्याने कर्फ्यु हटविणार

दंगलीत विदेशी, बांगलादेश, मालेगावचा हात असल्याबाबत विचारना केली असता मुख्यमंत्र्यांनी याबाबत आताच बोलणे संयुक्तिक होणार नसल्याचे सांगून तपासानंतर कुणाचा हात आहे, हे समोर येईल, अशी माहिती दिली. शहरातील काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत लावण्यात आलेल्या कर्फ्युमुळे जनजीवन विस्कळीत होऊन शिक्षण, व्यापारावर परिणाम होत आहे. त्यामुळे आजपासून टप्प्याटप्प्याने कर्फ्यु हटविण्यात येईल. परंतु संवेदनशील परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महिला पोलिसावर हल्ला, विनयभंग नाही

दंगलीत महिला पोलिसाचा विनयभंग केल्याच्या बातम्या काही प्रसार माध्यमे व सोशल मीडियावर झळकल्या. परंतु इतर पोलिसांप्रमाणे महिला पोलिसावरही हल्ला करण्यात आला. परंतु त्या महिला पोलिसासोबत अभद्र व्यवहार करण्यात आला नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

काँग्रेसच्या समितीचा सदस्यच दंगेखोर

काँग्रेसने दंगलीबाबत माहिती घेऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी समिती गठीत केल्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारना केली असता काँग्रेसच्या समितीतच अकोल्यातील दंगलीचा आरोपी सदस्य आहे. त्यामुळे ही समिती म्हणजे लांगुलचालन करणारी आणि पाय चाटण्याचा प्रकार आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर