शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

कॉंग्रेस-भाजपच्या ‘हात’मिळवणीत विजय कुणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:11 IST

अभय लांजेवार उमरेड : राज्यात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची महाआघाडी झाली. दुसरीकडे उमरेड ...

अभय लांजेवार

उमरेड : राज्यात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची महाआघाडी झाली. दुसरीकडे उमरेड नगर पालिकेत भलतेच चित्र समोर आले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी मतदान केले. कॉंग्रेस-भाजपच्या या ‘हात’मिळवणीत विजय नेमका कोणत्या पक्षाचा झाला, यावर आता चर्चा रुंगू लागल्या आहेत.

उमरेड पालिकेत भाजपची सत्ता आहे. उमरेडकरांनी २५ पैकी १९ नगरसेवक भाजपचे निवडून दिले. नगराध्यक्ष म्हणून विजयलक्ष्मी भदोरिया यांना पसंती दिली. दुसरीकडे कॉंग्रेसला केवळ ६ जागेवरच करिश्मा दाखविता आला. या आकडेवारीवरून उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे संपूर्ण १९ नगरसेवक एकजूट दाखवतील आणि उपाध्यक्ष ठरवतील, असे सर्वांनाच वाटले. झाले भलतेच. गंगाधर फलके आणि अरूणा हजारे हे दोन नगरसेवक एकमेकांविरूद्ध उभे ठाकले. भाजप विरुद्ध भाजप अशा लढाईत कॉंग्रेसने ‘हात’मिळवणी केली. भाजपाच्या एका गटाला संपूर्ण सहा मते बहाल केली आणि विजय आमचा झाला अशा तोऱ्यात फटाके फोडले.

साधारणत: वर्षभरानंतर पालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजणार आहे. अशावेळी एकमेकांना पाण्यात पाहण्याचे राजकारण या निवडणुकीतून समोर आले आहे. याचे पडसाद येणाऱ्या काळात नक्कीच दिसून येतील, लाभ कोणत्या पक्षाच्या पदरात पडेल हे आत्ताच सांगता येणार नाही.

एकजूट राखण्यात अपयश

माजी आमदार सुधीर पारवे, आनंद राऊत, कृऊबासचे सभापती रूपचंद कडू, शहराध्यक्ष दिलीप सोनटक्के, गटनेता डॉ. मुकेश मुदगल अशी नेत्यांची फौज भाजपात आहे. नियोजनबद्ध काम असताना आणि एकतर्फी लढाई असताना नगरसेवकांमध्ये एकजूट राखण्यात भाजप का अयशस्वी ठरली, हा चिंतनाचा विषय ठरला आहे.

कॉंग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

कॉंग्रेसने सुरेश चिचमलकर याला उपाध्यक्षपदाच्या मैदानात उतरविल्यानंतर चिचमलकरसह सारेच मते भाजपच्या पारड्यात गेली. यामागे नेमके कोणते गणित होते, असा प्रश्न येणाऱ्या निवडणुकीत मतदाता माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार राजू पारवे, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, शहर अध्यक्ष सुरेश पौनीकर आदींना विचारल्याशिवाय राहणार नाही. या संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर विजय नेमका भाजपचा झाला की कॉंग्रेसचा या प्रश्नावर ‘विनोद’ निर्मिती होत आहे.