शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

वाडी पालिकेची निवडणूक केव्हा?

By admin | Updated: November 22, 2014 02:37 IST

तीन महिन्यांपूर्वी वाडी ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा मिळाला. ग्रामपंचायत बरखास्त झाली. मात्र अद्याप निवडणूक झाली नसल्याने प्रशासकामार्फत काम सुरू आहे.

तीन महिन्यांपूर्वी वाडी ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा मिळाला. ग्रामपंचायत बरखास्त झाली. मात्र अद्याप निवडणूक झाली नसल्याने प्रशासकामार्फत काम सुरू आहे. परिणामी, तेथील विकासकामे खोळंबली असून कर्मचारीसुद्धा सुस्त झाल्याचे दिसून येते. वाडी ग्रामपंचायतला २५ आॅगस्ट २०१४ रोजी नगर परिषद घोषित करण्यात आले. नगर परिषदेचा दर्जा मिळताच ग्रामपंचायत बरखास्त करून नागपूर ग्रामीणच्या तहसीलदारांकडे प्रशासक म्हणून कार्यभार देण्यात आला. प्रशासक नियुक्त केला असला तरी लोकशाही मार्गाने नगर परिषदेचे कामकाज होणे गरजेचे आहे. त्यासाठी निवडणूक होणे आवश्यक आहे. परंतु, निवडणूकच न झाल्याने वाडी नगर परिषदेचे कामकाज अद्याप सुरळीत झाले नाही, असे दिसून येते. ग्रामपंचायत बरखास्त होताच येथील विकासकामे ठप्प पडली आहेत. प्रशासक म्हणून तहसीलदार आवश्यक तेवढा वेळ येथील कामासाठी देऊ शकत नाही. त्यातच त्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नाही. लोकप्रतिनिधी नसल्याने विकासकामांचा तसेच समस्या सोडविण्यासाठी तगादा लावणारा कुणीही नसल्याने नगर परिषदेचा ‘रामभरोसे कारभार’ सुरू आहे. नागरिकांना नगर परिषदेकडून विविध प्रमाणपत्राची आवश्यकता पडते. मात्र प्रशासक (तहसीलदार) नियमित कार्यालयात बसत नसल्याने नागरिकांना वारंवार नगर परिषदेच्या चकरा माराव्या लागतात. दोन-तीन दिवस कधी-कधी तर आठवडाभर चकरा मारल्यानंतर नागरिकांना प्रमाणपत्र मिळते, ही येथील वस्तुस्थिती आहे. नगर परिषद घोषित होताच या भागातील वॉर्ड क्र. २, ३, ४, ५ चे प्रतिनिधित्व करणारे जिल्हा परिषद सदस्य तसेच वॉर्ड क्र. २ व ४ आणि वॉर्ड क्र. ३ व ५ चे पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यामुळे या भागातील प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून ना पंचायत समितीत मांडू शकत; ना जिल्हा परिषदेत! असे असल्याने विकासकामे खोळंबली आहेत. समस्या सोडविल्या जात नाही. उलट समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.