शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

है तैयार हम !

By admin | Updated: October 14, 2014 01:01 IST

भयमुक्त वातावरणात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडावे यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जबरदस्त तयारी केली आहे. शहरातील वस्त्यावस्त्यात पोलिसांची गस्त सुरू असताना ग्रामीण

शहर आणि ग्रामीण पोलिसही सज्ज : निमलष्करी दल मदतीलानागपूर : भयमुक्त वातावरणात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडावे यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जबरदस्त तयारी केली आहे. शहरातील वस्त्यावस्त्यात पोलिसांची गस्त सुरू असताना ग्रामीण पोलिसांनी गुंड, दारू, शस्त्र आणि रोकड पकडण्यासाठी रस्त्यारस्त्यावर फिल्डिंग लावली आहे.विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहे. मतदारांना वेगवेगळे आमिष दाखवून, धाक दाखवून मते मिळवण्याचे प्रयत्न होतात. त्यामुळे कुठे पैसे, कुठे कपडे, कुठे भेटवस्तू तर कुठे दारू वाटली जात असल्याची चर्चा आहे. या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी धावपळ चालवली आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात हॉटेल, झोपडपट्ट्यात सर्चिंग सुरू आहे. चौकाचौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. एक हजार पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण चार हजारावर पोलीस कर्मचारी मतदानाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. नाशिक पोलीस अकादमीतूनही पीएसआय बंदोबस्ताला बोलवून घेण्यात आले आहे. आयटीबीटी आणि सीआयएसएफ तसेच राज्य राखीव दलासह निमलष्करी दलाच्या सात तुकड्या बंदोबस्तासाठी शहर पोलिसांनी बोलविल्या आहेत. मतदानाच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यासाठी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी आज दिवसभर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या. (प्रतिनिधी)ग्रामीण पोलिसही सज्जग्रामीण पोलिसांनीही जबरदस्त तयारी केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी विधानसभा निवडणुकीअनुषंगाने बंदोबस्ताचे चांगले नियोजन केले आहे. १५० पोलीस अधिकारी आणि २०० कर्मचारी तसेच ६२७ होमगार्डच्या मदतीने डॉ. आरती सिंह यांनी मतदानाच्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्र, सीआयडी, क्राईम पूणे येथील पोलीस अधिकारी, राज्य व केंद्रीय राखीव दल आणि तामिळनाडू तसेच तेलंगणा येथून निमलष्करी दलाच्या एकूण पाच तुकड्या बोलवून डॉ. सिंह यांनी मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणावर गुंडांची धरपकड सुरू आहे. ठिकठिकाणी दारूचा साठा पकडण्यात आला आहे. परप्रांतातून गुंड, बोगस मतदार, शस्त्रसाठा किंवा दारू आणली जाऊ नये म्हणून त्यांनी नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या परप्रांताच्या सीमा सील केल्या आहेत. १८ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यतील गुंडांवर पोलिसांची तीक्ष्ण नजर आहे. वाहनांची आणि संशयित व्यक्तीचीही कसून तपासणी केली जात आहे.