शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

हम हैं ना..

By admin | Updated: January 18, 2015 00:53 IST

बालिका वधू मालिकेतून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या प्रत्युशा बॅनर्जी आणि टीव्ही कलावंत दीप ढल्लन यांचा पुत्र कंवर ढिल्लन सोनी वाहिनीवरील ‘हम है ना..’ मालिकेच्या प्रमोशनसाठी लोकमत सखी

सोनी टीव्हीच्या कलावंतांचा लोकमत सखी मंचच्या सदस्यांशी संवाद
विहंग सालगट - नागपूर
बालिका वधू मालिकेतून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या प्रत्युशा बॅनर्जी आणि टीव्ही कलावंत दीप ढल्लन यांचा पुत्र कंवर ढिल्लन सोनी वाहिनीवरील ‘हम है ना..’ मालिकेच्या प्रमोशनसाठी लोकमत सखी मंचच्या संक्रांती मेळाव्यात आले. याप्रसंगी त्यांनी सखींशी संवाद साधला आणि आपले अनुभव सांगितले. याप्रसंगी त्यांच्याशी साधलेल्या संवादाचा काही अंश वाचकांसाठी
बालिका वधूने मिळाली ओळख
बालिका वधू, झलक दिखला जा, बिग बॉस आणि नंतर सावधान इंडिया या मालिकेत प्रत्युशाने भूमिका केल्या आहेत. पण बालिका वधू या मालिकेतूनच माझी ओळख निर्माण झाली, असे प्रत्युशाने सांगितले. त्यामुळे ही भूमिकाच मला जास्त आवडते. यातील आनंदीची भूमिका माझ्या कायम स्मरणात राहील. प्रत्येक मालिकेचा अनुभव वेगवेगळा असतो. बिग बॉस मध्ये काम करताना बरेच शिकायला मिळाले. झलक दिखला जाटचा अनुभव वेगळा आहे. येथे वेगवेगळे नृत्य प्रकार शिकता आले. मी जरा नाजूक असल्याने बरेचदा नृत्य करताना जखमही झाली. बालिका वधू आणि झलक दिखला जा एकाचवेळी करीत होती त्यावेळी मला डेंग्यू झाला होता. त्यात वेळ काढणे माझ्यासाठी कठीण होते पण मला ते करता आले. सावधान इंडियात निवेदन करताना अनेक सत्य घटना समजून घेता आल्या. बालिका वधूला रिप्लेस केले तेव्हा माझ्या मनात जरा भीती होतीच पण लोकांनी मला स्वीकारले. ‘हम है ना..’ मालिका माझ्यासाठी लहान मुलीसारखी आहे. ही कथा बनारसला घडणारी आहे. ही मालिका लोकांना नक्की आवडेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. मी मुळात जमशेदपूरची राहणारी आहे. दहावीत असताना मुंबईत जाऊन अभिनय करण्याची इच्छा झाली. पण पालकांनी मला कोलकात्याला जाण्यास सांगितले. कोलकात्यात माझे मन रमले नाही आणि मी मुंबईत आले. त्यावेळी माझे वयही कमी होते. त्यावेळी आई म्हणाली, सर्वांच्या विरोधात तू मुंबईत जात आहेस तर काहीतरी बनून दाखव. आता तोच प्रवास सुरू आहे, असे प्रत्युशाने सांगितले.
सिनेमात काम करण्याचे माझे स्वप्न : कंवर ढिल्लन
‘हम है ना..’ची कथा बनारस येथे घडणारी आहे. यातला बंटी हा सर्वांचाच आवडता आणि गरीब कुटुंबातला आहे. एक बंगाली मुलगी लंडनमधून बनारसला येते आणि बंटीशी तिची भेट होते. दोघांमध्ये प्रेम निर्माण होते. पण बंटीची आई तिला स्वीकारत नाही. आई, चांगला पती आणि मुलगा यांच्या संघर्षाची ही कथा आहे, असे कंवर म्हणाला.
मुंबईत मी पदवीचे शिक्षण घेत असताना प्रथम शिक्षण पूर्ण करण्याचाच माझा विचार होता. पण संधी आपली वाट पाहात नाही. वयाच्या १८ व्या वर्षीच एका मालिकेसाठी आमंत्रण आले आणि मालिकेत काम करताना मी अभ्यासही सुरु ठेवला. माझा भाऊ कॅनडात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तो आता परत येणार आहे.
पण मुंबई सोडून जाण्याची माझी इच्छा नाही कारण येथेच मला माझे भविष्य दिसते आहे. वडिलांनी प्रथम शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता त्यानंतर काय वाट्टेल ते कर, असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता मला जे करायचे ते करणार आहे.
घरातून मला प्रत्येक बाबीसाठी प्रोत्साहनच मिळाले. आता काही मालिकांमध्ये काम करतो आहे पण भविष्यात मला सिनेमात काम करण्याची इच्छा आहे. मी स्पष्टवक्ता आहे त्यामुळे बरेचदा लोक दुखावले जातात पण बेगडी जगणे मला आवडत नाही.