पाणीटंचाईची खात्री करावी लागणार
By Admin | Updated: May 10, 2014 01:25 IST2014-05-10T01:25:36+5:302014-05-10T01:25:36+5:30
टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करताना संबंधित गावात खरेच पाणीटंचाई आहे का याची खातरजमा संबंधित विभागाला करावी लागणार आहे.

पाणीटंचाईची खात्री करावी लागणार
|
नागपूर : टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करताना संबंधित गावात खरेच पाणीटंचाई आहे का याची खातरजमा संबंधित विभागाला करावी लागणार आहे. उन्हाळा आला की टंचाईग्रस्त गावांमध्ये करावयाच्या उपाययोजनेचा आराखडा प्रशासनाकडून तयार केला जातो. हा आराखडा तयार करताना विशेष परिश्रम करण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. गेल्या वर्षीचा आराखडा काढून त्यात स्थानिक पातळीवरच किरकोळ बदल करून तो मंजुरीसाठी पाठविला जातो. त्यामुळे दर वर्षी तीच ती गावे टंचाईग्रस्त आराखड्यात दिसून येतात. दरवर्षी कोट्यवधीचा निधी खर्च करूनही टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होताना दिसत नाही. |