शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्था परिवर्तनासाठीही लढावे लागणार

By admin | Updated: January 20, 2015 01:17 IST

सत्ता परिवर्तनाने प्रश्न सुटत नाही. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे, असे डॉ. हेडगेवार यांचे म्हणणे होते. सत्ता परिवर्तन झाले. परंतु व्यवस्था बदलली का? व्यवस्था तशीच आहे.

भामसंच्या अधिवेशनाचा समारोप : कृष्णचंद्र मिश्र यांचे आवाहन
नागपूर : सत्ता परिवर्तनाने प्रश्न सुटत नाही. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे, असे डॉ. हेडगेवार यांचे म्हणणे होते. सत्ता परिवर्तन झाले. परंतु व्यवस्था बदलली का? व्यवस्था तशीच आहे. त्यामुळे आता व्यवस्था परिवर्तनासाठीसुद्धा आम्हाला लढावे लागेल, असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय संघटनमंत्री कृष्णचंद्र मिश्र यांनी येथे केले.
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित भारतीय मजदूर संघाच्या १७ व्या विदर्भ प्रदेशच्या वार्षिक अधिवेशनाचा सोमवारी समारोप करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष रमेश पाटील अध्यक्षस्थानी होते. तर पश्चिम क्षेत्रीय संघटक रामदौर सिंह, भामसंचे माजी वित्त सचिव वसंतराव पिंपळापुरे, भामसं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभाकर बानासुरे, ज्येष्ठ नेते दिनकरराव जोशी व्यासपीठावर होते.
कृष्णचंद्र मिश्र म्हणाले, नक्षलवाद ही एक समस्या आहे. परंतु लोक नक्षलवादाकडे का वळतात याचा विचार होत नाही. एखाद्या तरुणाच्या हातात बंदूक पकडण्याची परिस्थिती ही व्यवस्थाच निर्माण करीत असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय मजदूर संघ कामगारांच्या हितासाठी लढणारी कामगार संघटना आहे.
स्वतंत्र भारतानंतर लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पं. नेहरूंपासून तर नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत प्रत्येक सरकार हे आमचेच आहे. जे सरकार कामगारांच्या हिताचा विचार करते, त्यांचे आम्ही समर्थन करतो. पण जे सरकार कामगारांच्या विरोधी भूमिका घेत असते, त्याविरोधात आम्ही आजवर लढत आलो आहोत, आणि यापुढेही लढत राहू, मग सरकार कुणाचेही असो. परंतु शत्रुसोबत लढणे सोपे असते, मात्र आपल्याच माणसाशी लढणे जरा कठीण असते, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सत्ताधारी आणि अधिकारी हे कामगारांना काहीच किंमत देत नाही. तेव्हा कामगारांनी आपली शक्ती वाढवण्याची गरज आहे. सरकार कुणाचेही असो कामगारांच्या हितासाठी आम्ही लढत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संघटनेला यावर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कार्यकर्त्यांना वर्षभराचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी यावेळी आखून दिला. ३० जुलै रोजी संघटनेच्या स्थापनादिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर संघटनेचा झेंडा लावावा आणि प्रत्येक जिल्ह्यात पूर्णवेळ कार्यरत एका कार्यकर्त्याची नियुक्ती करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. रमेश पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले. महामंत्री अशोक भुताड यांनी प्रास्ताविक व संचालन केले. (प्रतिनिधी)