शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

तापमान पुन्हा उसळले, अकाेला-अमरावती तापले.. बुलढाण्यात उष्णतेची लाट

By निशांत वानखेडे | Updated: May 11, 2026 20:15 IST

Nagpur : चार दिवस गारवा देणाऱ्या ढगांची गर्दी हटताच विदर्भासह महाराष्ट्रात सूर्यदेव पुन्हा सक्रिय झाले आहेत. एप्रिलमध्ये जागतिक तापमानाशी स्पर्धा करणाऱ्या अकाेला शहराचा पारा पुन्हा उसळला असून ४५ अंशाच्या वर पाेहचला आहे.

नागपूर : चार दिवस गारवा देणाऱ्या ढगांची गर्दी हटताच विदर्भासह महाराष्ट्रात सूर्यदेव पुन्हा सक्रिय झाले आहेत. एप्रिलमध्ये जागतिक तापमानाशी स्पर्धा करणाऱ्या अकाेला शहराचा पारा पुन्हा उसळला असून ४५ अंशाच्या वर पाेहचला आहे. अमरावती शहराचे तापमानही ४४ अंशावर वाढले आहे. दुसरीकडे वर्धा आणि नागपूरकरांनीही साेमवारी उन्हाच्या तीव्र चटक्यांचा सामना केला.

अवकाळी पावसाचे सावट हटताच विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील शहरे चांगलीच तापायला लागली आहेत. दाेन दिवसांपासून हळूहळू चढणारे तापमान साेमवारी चांगलेच उसळले. रविवारी ४४.५ अंशावर गेलेले मध्य महाराष्ट्रातील जळगाव शहर राज्यात सर्वाधित उष्ण हाेते, पण साेमवारी अकाेला शहराने उच्चांकी घेतली. येथील कमाल तापमान ४५.१ अंश नाेंदविण्यात आले, जे राज्यात सर्वाधिक उष्ण शहर ठरले. जळगावमध्ये अंशत: घट झाली असली तरी ४४.३ अंशासह ते राज्यात दुसरे सर्वात उष्ण शहर आहे. त्याखाली अमरावतीत ४४ अंशाची नाेंद झाली आहे. दरम्यान बुलढाणा शहराचे तापमान ४३.२ अंशावर पाेहचले असून सरासरीपेक्षा ४.१ अंशाने अधिक असल्याने येथील नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.

विदर्भात वर्धा ४३.८ अंशावर पाेहचले असून भंडाऱ्याचे तापमान ४ अंशाने उसळी घेत ४२ अंशावर चढले आहे. साेमवारी नागपूरला ४२ अंशाची नाेंद झाली. अद्यापतरी ते सरासरीच्या खाली असले तरी आर्द्रतायुक्त उकाड्याने नागपूरकरांना घामाघुम केले. आता केवळ गाेंदियाचा पारा ४० अंशाच्या खाली असून सरासरीरपेक्षा ३.३ अंशाने कमी आहे. विदर्भासह मराठवाड्याची शहरे ४३ अंशावर पाेहचली आहेत, तर मध्य महाराष्ट्रातही उन्हाचे चटके वाढले आहेत.

२ ते ४ अंशाने वाढेल पारा

दरम्यान हवामान विभागाने विदर्भासह मध्य भारतात १५ मे पर्यंत तापमानात २ ते ४ अंशाच्या वाढीचा अंदाज वर्तवला आहे. काही जिल्ह्यांना उष्ण लाटेचाही सामना करावा लागू शकताे. विशेषत: अकाेला, अमरावतीत सूर्यप्रकाेप अधिक हाेण्याची शक्यता आहे.

तापलेली शहरे (तापमान अंशात)
अकाेला - ४५.१
जळगाव - ४४.३
अमरावती - ४४
वर्धा - ४३.८
बुलढाणा - ४३.२
बीड - ४३.५
छ. संभाजीनगर - ४३.४
परभणी - ४३.२
मालेगाव - ४३.२

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Heatwave: Akola, Amravati Sizzle; Buldhana Faces Heatwave Conditions

Web Summary : Vidarbha and Maharashtra are experiencing rising temperatures. Akola reached 45.1°C, becoming the hottest city. Amravati, Jalgaon, and Wardha also recorded high temperatures. Buldhana faces a heatwave. Further temperature increases are expected.
टॅग्स :nagpurनागपूरHeatwaveउष्णतेची लाट