शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्थेला चालना देणारा प्रमाणित संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST

नागपूर : गंभीर परिस्थिती आणि मोठ्या अपेक्षांचा समतोल साधत कुठलीही मोठी घोषणा किंवा मोठे धोरण न राबविता अर्थमंत्र्यांनी समतोल ...

नागपूर : गंभीर परिस्थिती आणि मोठ्या अपेक्षांचा समतोल साधत कुठलीही मोठी घोषणा किंवा मोठे धोरण न राबविता अर्थमंत्र्यांनी समतोल साधत फक्त आवश्यक गोष्टींना चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. सामान्य करदाते, नागरिक आणि व्यावसायिक यांना कुठलीही वाढीव सवलत तथा करमुक्ती दिली नसली तरीही नवीन कोविड अधिभार लावला नाही, हेसुद्धा दिलासा देणारे आहे. पायाभूत सुविधांकरिता योग्य तरतुदी, सरकारी बँकांसाठी भरीव भांडवल मदत, तीन वर्षांनंतर आयकराची पुनर्तपासणी न होणे, एक व्यक्ती कंपनीकरिता कुठलीही भांडवल अथवा विक्री मर्यादा नसणे, बहुराज्यीय सहकारी संस्थेसाठी नवीन नियामक मंडळ गठीत करणे, आदी अर्थसंकल्पाच्या जमेच्या बाजू आहेत. अपेक्षित सरकारी उत्पन्न आणि खर्चाचा समतोल साधत कोरोना महामारीतून भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा संजीवनी कशी देता येईल, याचा प्रमाणबद्ध संकल्प अर्थसंकल्पात दिसून येतो. यंदाचा अर्थसंकल्प उद्योग-व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

अर्थसंकल्प प्रतिक्रिया ...

बजेट प्रगतिशील व व्यापक ()

बजेट एक प्रगतिशील व व्यापक असून अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राच्या विकासाला सुनिश्चित करणार आहे. व्यापाऱ्यांना व्यवसाय करताना सुविधा मिळणार आहे. बजेटमध्ये कोणतेही नवे कर नाहीत. देशातील वरिष्ठ नागरिकांना कराच्या बोझ्यापासून सुटकारा आणि आरोग्य व त्याच्या सेवांना सुनिश्चित करणे, ही बजेटची मुख्य विशेषत: आहेत.

सीए बी. सी. भरतीया, अध्यक्ष, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट).

स्वास्थ्य व टॅक्सपेयर केंद्रित ()

कोणताही नवीन कर न आकारता आणि आरोग्य सुविधांना जास्त निधी दिल्याने बजेट स्वास्थ्य आणि टॅक्सपेयर केंद्रित आहे. कर सुधारणेच्या दिशेने सरकारने पाऊले उचलली आहेत. करांच्या स्लॅबमध्ये बदल न केल्याने सामान्य नागरिक निराश आहेत. सीमाशुल्क कपातमुळे स्टील आणि सोन्याच्या किमतीत घसरण होईल. कंपनी कायदे सरळसोपे होणार आहेत.

श्रवण मालू, अध्यक्ष, विदर्भ टॅक्सपेयर असो.

सरकारने करदात्यांचा विश्वास जिंकला ()

करदात्यांना नवीन करापासून दिलासा आणि ईज ऑफ डुईंग बिझनेससंदर्भात सकारात्मक पाऊले सरकारने उचलली आहेत. आरोग्य क्षेत्राला जास्त निधी देऊन क्षेत्र मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. नागपूर मेट्रो दुसऱ्या टप्प्यांसह शेतकरी व पायाभूत सुविधांना महत्त्व देऊन विशेष तरतूद केल्याचा फायदा होणार आहे. कोरोना नुकसान झालेल्या हॉटेल व्यवसायाला दिलासा मिळाला नाही.

तेजिंदरसिंग रेणू, सचिव, विदर्भ टॅक्सपेयर असो.

अर्थव्यवस्थेच्या संजीवनीसाठी प्रमाणबद्ध संकल्प ()

अपेक्षित सरकारी उत्पन्न आणि खर्चाचा समतोल साधत कोरोना महामारीतून भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा संजीवनी कशी देता येईल, याचा प्रमाणबद्ध संकल्प अर्थसंकल्पात आहे. गंभीर परिस्थिती आणि मोठ्या अपेक्षांचा समतोल साधत कुठलीही मोठी घोषणा किंवा मोठे धोरण न करता अर्थमंत्र्यांनी समतोल साधत फक्त आवश्यक गोष्टींना चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला आहे.

सीए अभिजित केळकर, पश्चिम क्षेत्रीय सदस्य, आयसीएआय.

पायाभूत सुविधावर भर हे चांगले द्योतक ()

प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराबाबत विशेष बदल न करता जलसंधारण, रस्ते, रेल्वे आणि पायाभूत सुविधांवर खर्च करण्यावर भर दिलेला आहे. भांडवली खर्चासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ३४ टक्के वाढ केली आहे. सीमा शुल्क कमी केल्याने छोट्या उद्योगांसाठी कच्च्या मालाच्या किमती कमी होतील. नागपूर व नाशिक मेट्रोसाठी तरतूद उत्तम आहे.

सीए मिलिंद कानडे, उपाध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.