शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

अन्नधान्य पुरवठा व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे विशेष लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना संपूर्ण यंत्रणा रुग्णसेवेत लागली आहे. मात्र, यासोबतच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना संपूर्ण यंत्रणा रुग्णसेवेत लागली आहे. मात्र, यासोबतच लॉकडाऊनच्या काळामधील अन्नधान्य पुरवठा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण, गृह अलगीकरण, मायक्रो झोन निर्मिती, कॉल सेंटरची संपर्क व्यवस्था या बाबींची काळजी घेण्याचे निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

नागपूर शहरातील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या ७ लाख ६१४ शिधापत्रिकाधारक आहेत. जिल्ह्यात तेराशे स्वस्त धान्य दुकाने आहेत. अंत्योदयमध्ये ७७ हजार ७८ शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. प्राधान्य धारकांमध्ये ३ लाख १५ हजार ८२ शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. या सर्वांना प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत वाटप केले जाणे आवश्यक आहे. मात्र, हे वाटप करताना शिधापत्रिकाधारकांपैकी अनेकजण पॉझिटिव्ह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात स्वस्त धान्य दुकानदारांनी आक्षेप घेतला आहे. सरकारने रेशन दुकानदारांना पॉश मशीनद्वारे वाटपाची असणारी अट शिथील करावी तसेच त्यांना विम्याचे कवच द्यावे, अशी मागणी पुढे आली असून, या संदर्भात काय उपाययोजना करता येईल, याबाबत प्रशासनाने तोडगा काढावा. याविषयी प्रसंगी वरिष्ठांशी चर्चा करता येईल, असेही सांगितले.

एफसीआयमधून अद्याप धान्याची उचल व्हायची आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांमध्ये वितरण सुरू होण्यापूर्वी सर्व समस्या निकाली काढण्याचे निर्देशही दिले.

बॉक्स

प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णामागे किमान १० ते १५ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हावे.

पूर्वीप्रमाणे प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णामागे किमान १० ते १५ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हायला हवे, असे निर्देश पालकमंत्री राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले. गृह अलगीकरण, मायक्रो झोनमधील रुग्णांशी सातत्याचा संपर्क असणे आवश्यक आहे. मुंबई मनपाने रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी विशेष व्यवस्था उभारली आहे. त्या मॉडेलचा नागपूरमध्ये उपयोग होतो का, याची चाचपणी करण्यासही त्यांनी सांगितले. महानगरपालिकेने कॉल सेंटर सुरू केले आहे, मात्र त्यातून नागरिकांचे समाधान होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.