शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

आधी निगेटिव्ह रिपोर्ट दाखवा, मगच आमच्या जिल्ह्यात या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 7:26 PM

Coronavirus in Nagpur news; नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काही विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार परजिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागपूर जिल्हा पोलीस कडककारवाईचाही धडाका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात मृत्यूचे तांडव करणाऱ्या कोरोनाने ग्रामीण भागातही थैमान घालणे सुरू केले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण प्रचंड वाढला आहे. तो आणखी वाढू नये म्हणून नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काही विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार परजिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱ्या व्यतिरिक्त इतर सर्वांना ‘आधी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवा, नंतरच आमच्या जिल्ह्यात या’, असे सांगितले जात आहे.

शहराच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गेल्या वर्षीही बंदोबस्ताचे आणि उपाययोजनांचे प्रशंसनीय नियोजन केले होते. त्यामुळे शहराच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय कमी होती. या वर्षी मात्र शहराबरोबरच नागपूर जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात इस्पितळ आणि आरोग्याच्या उपायोजना तोकड्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बाधित मोठ्या प्रमाणात उपचारासाठी नागपुरात धाव घेत आहेत. परिणामी नागपुरातील आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे. तो आणखी वाढू नये म्हणून नागपूर जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांनी नाकेबंदी केली असून बाहेर जिल्ह्यातील व्यक्ती जिल्ह्यात (सार्वजनिक प्रवासी सेवेचा अपवाद वगळता) दाखल होत असेल तर त्याला कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे असे प्रमाणपत्र नाही त्यांना जिल्ह्याच्या सीमेवरूनच परत केले जात आहे. नागपूर जिल्ह्याला लागून देवलापार आणि केळवद नंतर छिंदवाडा आणि शिवनी हे मध्य प्रदेशातील जिल्हे आहेत. त्यामुळे या सीमांवरची नाकाबंदी अधिकच कडक आहे. जीवनावश्यक वस्तू आणि आरोग्याशी संबंधित सेवा वगळता अन्य कशाचीही ने-आण करू पाहणाऱ्या वाहनांच्या चालकापासून तो वाहनात बसलेल्या प्रत्येकाला कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवल्याशिवाय नागपूर जिल्ह्यात प्रवेश दिले जात नाही.

नो मास्कच्या १३ हजार कारवाया

जिल्ह्यातील गावागावात पोलिसांनी समुपदेशन चालवले आहे. गर्दी होऊ नये, यासाठी सर्वच प्रकारच्या दुकानात, खासकरून भाजीबाजारात दुकानदारांना गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांच्याकडून आदेशाचे उल्लंघन केले जाते, अशांवर कारवाई होत आहे. बेशिस्त नागरिकांवर ही पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असून गेल्या महिनाभरात जिल्ह्यात १३,२५१ नागरिकांवर ‘नो मास्क’ची कारवाई केली आहे. ५ मंगल कार्यालये आणि २० हॉटेल्सवरही कारवाई करण्यात आली आहे.

---

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस