शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते दुरुस्तीचे नियोजन युद्धपातळीवर

By admin | Updated: May 11, 2014 01:26 IST

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची वाट लागली. सहा महिन्यात रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने ग्रामीण भागात रोष आहे.

नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची वाट लागली. सहा महिन्यात रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने ग्रामीण भागात रोष आहे. जिल्हा परिषद सदस्यांना रोषाला सामोरे जावे लागत आहे. जूनमध्ये पावसाळा याला सुरुवात होईल. पावसाळ्यात दुरुस्तीची कामे करता येत नाही. चार महिन्यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने जि.प.च्या बांधकाम विभागामार्फत रस्ते व पूल दुरुस्तीचे नियोजन युद्धपातपळीवर सुरू आहे. रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडून ३२ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. आचारसंहितेमुळे दुरुस्तीची मंजुरीची प्रक्रि या थांबली आहे. आचारसंहिता संपताच आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जाणार आहे. तसेच २०१४-१५ या वर्षाचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीचा समावेश राहणार आहे. हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे लवकरच पाठविला जाणार आहे. जिल्ह्यातील नादुरुस्त रस्त्यांमुळे ग्रामीण भागात लोक त्रस्त आहेत. याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता असल्याने रस्ते दुरुस्तीसाठी आमदारांनीही आग्रह धरला आहे. लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, यासाठी आमदारांनी दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी आपल्या नावाचा फलक लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. यात आमदार निधीतून दुरुस्त न केलेल्या कामाच्या ठिकाणीही लावण्यात आलेले आमदारांचे फलक चर्चेचा विषय आहे. नागपूर जिल्ह्यात ८०९१ किलोमीटर लांबीचे ग्रामीण तर २८५९ किलोमीटर लांबीचे इतर जिल्हा मार्ग आहेत. या मार्गांची संख्या पाच हजारांवर आहे. जून व जुलै महिन्यातील अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील १९५६ किलोमीटर लांबीचे ८०३ रस्ते नादुरुस्त झालेले आहेत. गौण खनिजांच्या वाहतुकीमुळे १३१५ कि.मी. लांबीचे २६१ रस्ते नादुरुस्त झालेले आहेत. अतिवृष्टीमुळे नादुरुस्त रस्त्यांसाठी १५८ कोटींची तर जड वाहनांमुळे नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २१० अशा ३७८ कोटींची शासनाकडे मागणी केली आहे. शासनाकडून ३२ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. (प्रतिनिधी)