शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
4
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
6
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
7
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
8
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
9
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
10
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
11
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
12
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
13
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
14
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
15
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
16
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
17
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
18
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
19
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
20
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक शहरातील अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने गुरुवारी (दि. २१)पासून अतिक्रमण हटाव माेहीम राबवायला सुरुवात केली आहे. या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने गुरुवारी (दि. २१)पासून अतिक्रमण हटाव माेहीम राबवायला सुरुवात केली आहे. या माेहिमेंतर्गत पहिल्या दिवशी शहरातील महात्मा गांधी चाैक, सुपर मार्केट, पंडित नेहरू चाैक, शांतीनाथ मंदिर राेड, बसस्थानक चाैक यासह अन्य भागातील अतिक्रमण काढण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कारवाईच्यावेळी पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता.

शहरातील महत्त्वाच्या भागात काही नागरिकांनी राेडलगत वाहनतळ तयार करून माेठ्या प्रमाणात वाहने उभी करायला सुरुवात केली हाेती. काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानांसमाेर शेडची निर्मिती केली हाेती. त्यामुळे शहरातील राेड अरुंद हाेऊन वाहतूक काेंडी व्हायची. याच वाहतूक काेंडीतून वाहन चालविताना तसेच पायी चालताना त्रास हाेत असल्याने अपघाताची शक्यताही बळावली हाेती. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्याची मागणीही काहींनी स्थानिक पालिका प्रशासनाकडे केली हाेती.

त्याअनुषंगाने पालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेत अतिक्रमणधारकांना नाेटीस बजावून त्यांची अतिक्रमणे स्वत:हून काढण्याची सूचना केली. त्यासाठी त्यांना अवधीही देण्यात आला. हा अवधी संपल्यानंतर ज्यांनी अतिक्रमणे स्वत:हून काढली नाहीत, त्यांची अतिक्रमणे काढायला स्थानिक पालिका प्रशासनाने गुरुवारपासून सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी शहरातील महात्मा गांधी चाैक, सुपर मार्केट, पंडित नेहरू चाैक, शांतीनाथ मंदिर राेड, बसस्थानक चाैक यासह अन्य भागातील अतिक्रमणे काढण्यात आली. ही माेहीम पालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सव्वालाखे यांच्या नेतृत्वात राबविली जात असून, ठाणेदार मकेश्वर व पाेलीस उपनिरीक्षक शेंडे यांच्या नेतृत्वात पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.

...

वाहनतळाची समस्या कायम

बहुतांश नागरिक त्यांची वाहने राेडलगत मिळेल तिथे उभी करतात. काही दुकानदार खाद्यपदार्थांची दुकाने व हातठेले राेडलगत थाटतात. त्यामुळे रहदारीस अडसर निर्माण हाेत असून, प्रसंगी भांडणेही हाेतात. अतिक्रमण हटविण्यात आल्याने हातठेलेवाले व छाेट्या दुकानदारांच्या उपजीविकेची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या छाेट्या दुकानदारांना त्यांच्या दुकानांसाठी तसेच नागरिकांना त्यांची वाहने उभी करण्यासाठी जागा उपलघ करून देणे गरजेचे आहे. ही समस्या कायमस्वरुपी न साेडविल्यास ती पुन्हा गंभीर रूप धारण करण्याची शक्यता बळावली आहे.

...

शहराचे साैंदर्यीकरण आणि नागरिकांची साेय लक्षात घेता, ही माेहीम वर्षभर राबविली जाणार आहे. यात काही नागरिकांची गैरसाेय हाेणार आहे. नागरिकांनी अतिक्रमण न करता जागा रिकामी ठेवावी आणि या अतिक्रमण हटाव माेहिमेस पालिका प्रशासनाला सहकार्य करावे. शहरातील सुपर मार्केट परिसरात वाहनतळाची व्यवस्था केली जाईल.

- अर्चना वंजारी, मुख्याधिकारी,

नगरपरिषद रामटेक.