शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिक्रांतिविरुद्ध लढण्यासाठी सज्ज राहा

By admin | Updated: January 18, 2015 00:54 IST

तथागत गौतम बुद्ध यांनी या देशात सर्वप्रथम क्रांती घडवून आणली. परंतु जातीयवादी शक्तींना ते मानवले नाही. त्यांनी त्याविरोधात प्रतिक्रांति केली आणि बौद्ध धम्म या देशातूनच नष्ट केला.

बुद्ध महोत्सवाचे उद्घाटन : धम्मचारी सुभूती यांचे प्रतिपादन
नागपूर : तथागत गौतम बुद्ध यांनी या देशात सर्वप्रथम क्रांती घडवून आणली. परंतु जातीयवादी शक्तींना ते मानवले नाही. त्यांनी त्याविरोधात प्रतिक्रांति केली आणि बौद्ध धम्म या देशातूनच नष्ट केला. तब्बल १५०० वर्षे बौद्ध धम्म या देशातच नव्हता. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ मध्ये पुन्हा क्रांती घडवून आणली आणि बौद्ध धम्माला पुनर्जीवित केले. मात्र प्रतिक्रांति करणारी शक्ती आजही कायम असून ती मजबूत आहे. तेव्हा या प्रतिक्रांति विरुद्ध लढण्यासाठी आजच्या पिढीला क्रांती समजून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन इंग्लंडमधील प्रसिद्ध लेखक धम्मचारी सुभूती यांनी येथे केले.
त्रिरत्न बुद्ध महासंघाच्या नागपूर बुद्धिस्ट सेंटरच्यावतीने दीक्षाभूमीवर आयोजित पाचव्या बुद्ध महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख प्रवचनकार म्हणून ते बोलत होते. त्यांच्या इंग्रजी प्रवचनाचा हिंदी अनुवाद मैत्रीवीर नागार्जुन यांनी केला. याप्रसंगी चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर, डॉ. त्रिलोक हजारे, धम्मचारी साधना रत्न, धम्मचारी अमृतासिद्धी, धम्मचारी मैत्रेयसागर प्रमुख अतिथी होते.
धम्मचारी सुभूती म्हणाले, तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त होण्यापूर्वी या देशात जातपात, भेदाभेद असे अनेक प्रकार होते. परंतु तथागत गौतम बुद्धांनी धम्माच्या माध्यमातून समाजात क्रांती केली. सर्व मनुष्य समान आहेत. त्याच्यात कुठलाही फरक नाही, हा विचार सर्व प्रथम त्यांनी मांडला. या विचारांनी समाजात व संपूर्ण देशात क्रांती घडवून आणली. ही क्रांती जगभर पसरली. मात्र त्याविरोधात प्रतिक्रांति करण्यात आली आणि ते यशस्वी झाले. अतिशय कष्टांनी पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने आपल्याला बुद्धाचा धम्म मिळाला आहे. त्यामुळे आता प्रतिक्रांति यशस्वी होऊ द्यायची नाही. त्यामुळे नवीन पिढीने बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना समजून घेणे गरजेचे आहे. या दोन्ही महापुरुषांच्या विचारांनीच आता आपण पुढे जायचे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविक डॉ. सुनील तलवारे यांनी केले. संचालन ऋतायुष यांनी केले. (प्रतिनिधी)
दीक्षाभूमी बौद्धांचे सारनाथ
महोत्सवाचे उद्घाटन करताना भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई म्हणाले, दीक्षाभूमी ही बौद्धांचे सारनाथ होय. त्यामुळे या पवित्र भूमीचे रक्षण आम्हा सर्वांनी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व बौद्धबांधवांनी आणि विविध संघटनांनी मिळून काम करावे, असे आवाहन भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी महोत्सवाचे उद्घाटक म्हणून केले.
आज उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोदवादनाची मेजवानी
बुद्ध महोत्सवाला सुरुवात झाली असून दीक्षाभूमीवर उद्या रविवारपासून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. रविवारी सायंकाळी ६.३० वाजता विश्वविख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोदवादनाचा आनंद नागपूरकर रसिकांना उपभोगता येईल.