शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

समस्या निकाली न काढता परीक्षाच रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:08 IST

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागांंतर्गत जागांसाठी होणाऱ्या भरती परीक्षेतील समस्या आधीच निकाली न काढता परीक्षा रातोरात पुढे ढकलण्या ...

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागांंतर्गत जागांसाठी होणाऱ्या भरती परीक्षेतील समस्या आधीच निकाली न काढता परीक्षा रातोरात पुढे ढकलण्या निर्णयाचा मेयो, मेडिकलमधील पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांनी निषेध नोंदविला. शनिवारी विद्यार्थ्यांनी काळी रिबीन बांधून रुग्णसेवा दिली तर काहींनी मेडिकलच्या समोर नारे-निदर्शने केली.

आरोग्य विभागाच्या वतीने २५ सप्टेंबर रोजी ‘गट क’ संवर्गातील २ हजार ७३९ पदांसाठी तर, २६ सप्टेंबर ‘गट ड संवर्गातील ३ हजार ४६६’ पदांसाठी रोजी लेखी परीक्षा होणार होती. या परीक्षेच्या ‘हॉल तिकीट’चा गोंधळ आधीपासूनच चर्चेत होता. काहींच्या नावात घोळ होता. बहुसंख्य विद्यार्थ्यांना हवे ते सेंटर मिळाले नव्हते. काही विद्यार्थ्यांना तर महाराष्ट्राबाहेर परीक्षा केंद्र देण्यात आले होते. याच्या तक्रारीही झाल्या. परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. अखेर नाईलाजेपोटी विद्यार्थी एक दिवसापूर्वीच केंद्राच्या ठिकाणी पोहचले. परंतु शुक्रवारी रात्री अचानक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षेची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या बाह्यस्रोत संस्था ‘न्यासा कम्युनिकेशन’च्या अकार्यक्षमतेचे कारण देत, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच विद्यार्थ्यांना याचा फटका बसला.

याचा निषेध म्हणून शनिवारी सकाळी ‘पॅरामेडिकल स्टुडंट वेलफेअर ॲण्ड ॲल्युमिना असोसिएशन’च्या वतीने मेयो व मेडिकलच्या पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांनी मेडिकलच्या परिसरात नारे-निदर्शने केली. जे विद्यार्थी रुग्णसेवेत होते त्यांनी काळी रिबीन बांधून सेवा दिली. पॅरामेडिकल स्टुडंट वेलफेअर ॲण्ड ॲल्युमिना असोसिएशनचे राज्याध्यक्ष अक्षय गायधने म्हणाले, सरकारने विद्यार्थ्यांशी चालविला खेळ थांबवायला हवा. ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसला, त्याची परतफेड व्हायला हवी.

नागपूर विभागातून ६४ हजार ७४९ विद्यार्थी देणार होते परीक्षा

सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘गट क’ संवर्गासाठी शनिवारी होणाऱ्या परीक्षेत नागपूर विभागातून ३८ हजार ६६७ तर ‘गट ड’ संवर्गासाठी रविवारी होणाऱ्या परीक्षेत ६४ हजार ७४९ विद्यार्थी परीक्षा देणार होते. परंतु परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

विभागानुसार व्हायला हव्यात परीक्षा

आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, राज्यात आठ विभाग आहेत. पदभरतीच्या परीक्षा या विभागानुसार व्हायला हव्यात. यामुळे परीक्षेचे नियोजन करणे सोपे ठरते. सोबतच येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करता येतात. शिवाय, एखाद्या विभागात काही समस्या निर्माण झाल्यास केवळ त्याच विभागातील परीक्षा रद्द करता येतात.