शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

वृक्षारोपण ही चळवळ व्हावी

By admin | Published: June 26, 2017 1:50 AM

राज्य सरकारने येत्या तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.

अनिल सोले : वृक्षदिंडीचे नागपुरात स्वागत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने येत्या तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यावर्षी चार कोटी, पुढच्या वर्षी १३ कोटी व त्याच्या पुढच्या वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवड करायची आहे. आजघडीला महाराष्ट्रात केवळ २०.४४ टक्के वन शिल्लक आहे. वनाचे क्षेत्र ३३ टक्के पोहोचविण्यासाठी ४०० कोटी वृक्षांची गरज आहे. पर्यावरणाचा ढासळता ऱ्हास थांबवायचा असेल तर वृक्षारोपण व संवर्धनाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी वृक्षारोपण ही चळवळ होणे गरजेचे असल्याचे मत आमदार प्रा. अनिल सोले यांनी व्यक्त केले. २२ जूनपासून अनिल सोले यांच्या नेतृत्वात वृक्षदिंडीला सुरुवात झाली. रविवारी ही दिंडी नागपुरात पोहोचली. नागपूर महापालिकेतर्फे मनपाच्या टाऊन हॉलमध्ये वृक्षदिंडीचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अनिल सोले बोलत होते. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, आमदार गिरीश व्यास, जयप्रकाश गुप्ता, बबली मेश्राम, कौस्तुभ चॅटर्जी, नवनीतसिंग तुली, विक्की कुकरेजा आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना सोले म्हणाले की, दीडशे वर्षांपूर्वी इंधनाला पैसे लागत नव्हते. ५० वर्षांपूर्वी पाण्याला पैसे लागत नव्हते. सध्या तरी हवेला पैसे लागत नाही. मात्र येणाऱ्या ३० ते ४० वर्षांत हवेसाठीसुद्धा पैसे खर्च करावे लागणार आहे, प्रत्येकाला हातात आॅक्सिजनचे सिलेंडर बाळगावे लागणार आहे. विकासासाठी झाडे तोडणे आवश्यक आहे. परंतु जेवढी तोडली त्याच्या दुप्पट लावून ती जगविणे याचेही भान असायला हवे. आजघडीला विकासाचा अजेंडा राबविताना पर्यावरणाच्या आधारावर राबविल्यास शाश्वत विकास शक्य होईल. यावेळी बोलताना सुधाकर कोहळे म्हणाले की, सरकार चार कोटी वृक्षांची लागवड करून एक कोटी लोकांना जीवन देण्याचे काम करीत आहे. वृक्षदिंडीच्या स्वागत कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कौस्तुभ चॅटर्जी यांनी पॅरिस करार आणि शाश्वत विकास यावर मार्गदर्शन केले. महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीकडे वेधले लक्ष वृक्षदिंडी हा कार्यक्रम सरकारचा कार्यक्रम आहे. शासनाचे महत्त्वाचे अभियान असतानाही दिंडीचे स्वागत करण्यासाठी महापालिकेचे महापौर, उपमहापौर व अन्य पदाधिकारी उपस्थित नसल्यामुळे गिरीश व्यास यांनी नाराजी व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती म्हणजे शासनाच्या अभियानाचा अवमानच असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. याबाबत जाब विचारावा असे सुधाकर कोहळे यांना त्यांनी सांगितले.