शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

कांदे-बटाट्याचे भाव उतरले, सामान्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दीड महिन्यांपूर्वी प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांवर पोहोचलेल्या कांदे-बटाट्याच्या भावात सध्या बरीच घसरण झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दीड महिन्यांपूर्वी प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांवर पोहोचलेल्या कांदे-बटाट्याच्या भावात सध्या बरीच घसरण झाली आहे. कांदे ठोक बाजारामध्ये १५ ते ३० रुपये किलो आणि बटाट्यांचे भाव १० ते १६ रुपयांदरम्यान आहेत. लालच्या तुलनेत पांढऱ्या कांद्याचे भाव कमी आहेत. लसूणची आवक जास्त असतानाही भाव वाढले आहेत. किरकोळ बाजारामध्ये १२० ते १५० रुपये किलोचा भाव आहे.

कळमना ठोक बाजारात लाल कांद्याचे १५ ट्रक (एक ट्रक ३० टन) आणि पांढऱ्या कांद्याचे ५ ते ७ ट्रक येत आहेत. लाल कांदे जळगाव, नाशिक येथून तर पांढरे कांदे गुजरात व नाशिक येथून येत आहेत. अमरावती आणि अकोला येथील पांढरे कांदे मार्च महिन्यात बाजारात येतील. सध्या सर्वच राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन निघाल्याने भाव उतरले आहेत. विदेशातही उत्पादन जास्त असल्याचा परिणाम निर्यातीवर झाला आहे. पूर्वीच्या तुलनेत निर्यात कमी असल्याची माहिती कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी दिली.

दीड महिन्यांपूर्वी किरकोळमध्ये बटाट्याचे भाव ५० ते ६० रुपये होते. पण आता उत्तर प्रदेशासह अन्य राज्यांमध्ये बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात बाजारात आले आहे. कळमन्यात आग्रा, प्रयागराज, कानपूर, इटावा या जिल्ह्यांतून दररोज २० ट्रकची आवक होत आहे. आवक जास्त असल्याने यावर्षी बटाट्याचा स्टॉक मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे पुढे भाव वाढणार नाहीत.

लसूण महागच

मध्यंतरी मुसळधार पावसामुळे लसणाचे पीक खराब झाले होते. तेव्हा किरकोळ बाजारात भाव १८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. पण आता मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्हा आणि लगतच्या परिसरात लसूणचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने कळमना बाजारात आवक वाढली आहे. दररोज ५ ते ७ ट्रकची आवक होत आहे. दर्जानुसार ठोक बाजारामध्ये ५० ते ९० रुपये किलो तर किरकोळ बाजारामध्ये १४० रुपये किलोपर्यंत विक्री होत आहे. गेल्यावर्षी याचकाळात ८० ते ९० रुपयांपर्यंत भाव होते. कळमन्यातून लगतच्या राज्यात मोठ्या प्रमाणात लसूण विक्रीसाठी जात असल्याचे वसानी यांनी सांगितले.