शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी नवे पालकमंत्री, कसा होणार गोंदिया-भंडाऱ्याचा विकास? झेंडामंत्री नेमण्यापेक्षा स्थानिक नेतृत्वाला संधी देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 16:43 IST

Nagpur : भंडारा जिल्ह्याचा अनुभवही असाच आहे. नव्या महायुती सरकारला अजून वर्ष पूर्ण झालेले नाही. परंतु या जिल्ह्यानेही दोन पालकमंत्री अनुभवले. २०१९ ते २०२५ दरम्यान जिल्ह्याने आठ पालकमंत्री पाहिले.

नागपूर :गोंदियाचे पालकमंत्री म्हणून बाबासाहेब पाटील यांच्याऐवजी इंद्रनील नाईक यांची बुधवारी वर्णी लागली आणि दरवर्षी नवे पालकमंत्री नेमण्याची संतापजनक परंपरा कायम राहिली. या संगीतखूर्चीचा शेवट कधी होईल, याची या दोन्ही जिल्ह्यांना प्रतीक्षा आहे. या खेळामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाचा खेळखंडोबा झाला आहे.

गोंदिया जिल्ह्याला सन २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कार्यकाळात पाच पालकमंत्री लाभले होते. यात सुधीर मुनगंटीवार, धर्मरावबाबा आत्राम, नवाब मलिक, परिणय फुके, प्राजक्त तनपुरे आदी पाच पालकमंत्र्यांचा समावेश होता. जानेवारी २०२५ मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी नऊ महिन्यांतच हे पद सोडल्याने नवे पालकमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्याचा अनुभवही असाच आहे. नव्या महायुती सरकारला अजून वर्ष पूर्ण झालेले नाही. परंतु या जिल्ह्यानेही दोन पालकमंत्री अनुभवले. २०१९ ते २०२५ दरम्यान जिल्ह्याने आठ पालकमंत्री पाहिले. डॉ. दीपक सावंत, सतेज पाटील, विश्वजीत कदम, सुनील केदार, देवेंद्र फडणवीस, डॉ. विजयकुमार गावित यांचा समावेश होता तर १९ जानेवारी २०२४ ते २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत डॉ. संजय सावकारे व आता डॉ. पंकज भोयर यांच्याकडे पालकत्वाची जबाबदारी आहे.

कोणत्याही जिल्हयाच्या विकासात पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असल्याने असा दरवर्षी खेळ सुरू असल्याने ही सावत्र वागणूक का दिली जात आहे, असा प्रश्न लोकांकडून विचारला जात आहे. नुसतेच झेंडामंत्री नेमण्यापेक्षा स्थानिक नेतृत्व का दिले जात नाही, हा प्रश्नदेखील आहेच.

पाटील यांच्याऐवजी इंद्रनील नाईक गोंदियाचे पालकमंत्री

राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रकृतीचे कारण पुढे करीत गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मंगळवारी (दि.१४) सोडले. पाटील यांच्या जागी उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे गोंदियाची धुरा देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांपूर्वीच बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्रिपद सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकांपूर्वीच भाकरी फिरविल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Frequent Guardian Minister Changes Hinder Gondia-Bhandara Development: Local Leadership Demanded

Web Summary : Gondia-Bhandara face development setbacks due to frequent guardian minister changes. Gondia had five ministers in five years, Bhandara eight. Locals question this instability, demanding local leadership over appointed officials for consistent progress.
टॅग्स :nagpurनागपूरPoliticsराजकारणgondiya-acगोंदियाbhandara-acभंडारा