शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

खरा इतिहास शोधण्याची गरज

By admin | Updated: January 20, 2015 01:19 IST

भारताला बुद्ध संस्कृतीच्या रूपात वैभवशाली इतिहास लाभलेला आहे. परंतु यापैकी बहुतांश इतिहास हा जाणीवपूर्व दडपण्यात आला असून भारताच्या वैभवशाली इतिहासाची माहिती करून घ्यायची

रत्नावली प्रवचनमाला : धम्मचारी सुभूती यांचे प्रतिपादन
नागपूर : भारताला बुद्ध संस्कृतीच्या रूपात वैभवशाली इतिहास लाभलेला आहे. परंतु यापैकी बहुतांश इतिहास हा जाणीवपूर्व दडपण्यात आला असून भारताच्या वैभवशाली इतिहासाची माहिती करून घ्यायची असेल तर भारताचा खरा इतिहास शोधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन इंग्लंडचे रहिवासी असलेले त्रिरत्न बौद्ध महासंघाचे ज्येष्ठ धम्मचारी सुभूती यांनी आज येथे केले.
त्रिरत्न बुद्ध महासंघाच्या नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या बुद्ध महोत्सवांतर्गत सोमवारी रत्नावली प्रवचनमालेस सुरुवात करण्यात आली. या प्रवचनमालेतील पहिले पुष्प गुंफतांना धम्मचारी सुभूती यांनी महान बौद्ध विद्वान असंग व वसुबंधू यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. मैत्रीवीर नागार्जुन यांनी अनुवाद केला. नागकेतू यांनी भूमिका विषद केली.
धम्मचारी सुभूती म्हणाले, प्राचीन भारतात महान बौद्ध आचार्य असंग आणि वसुबंधू होऊन गेलेत. परंतु त्यांच्या जीवनाविषयी भारतीय इतिहासामध्ये फारसे लिहिल्याच गेले नाही. कारण इतिहास केवळ त्याच लोकांनी लिहिले जे जिंकले. बुद्धांची महान संस्कृती अशाच अनुल्लेखाने गाडल्या गेली. त्यामुळेच या दोन्ही महान आचार्यांबाबत आपल्याला फारशी माहिती नाही. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथामध्ये या महान आचार्यांसंबधी संदर्भ सापडतात. आचार्य असंग आणि वसुबंधू यांच्याबाबत जी काही माहिती आज उपलब्ध आहे, ती त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमुळे. परंतु ते मौलिक ग्रंथ भारतात नसून तिबेट आणि चीनमध्ये त्यांच्या भाषेत भाषांतरित करून जतन करून ठेवण्यात आले आहे. या दोन्ही देशात शेकडो वर्षांपासून हे ग्रंथ आजही सुरक्षित आहेत. भारत मात्र ही मौलिक ग्रंथसंपदा गमावून बसला आहे.
असंग आणि वसुबंधू हे चौथ्या शतकात गुप्त काळात होऊन गेलेले महान आचार्य आहेत. तेव्हा समुद्रगुप्त यांचे राज्य होते. समुद्रगुप्ताचे राज्य तेव्हा अफगाणिस्तानपासून बंगालपर्यंत पसरलेले होते. हे दोन्ही बंधू राजदरबारी होते. परंतु आपल्या मुलांनी बुद्धांच्या संघात सामील व्हावे, अशी तिची इच्छा होती. ती इच्छा तिने पूर्ण केली. दोन्ही बंधू बुद्धाच्या संघात सामील झाले.
अनेक वर्षे त्यांनी धम्माचा अभ्यास केला. परंतु केवळ अभ्यासच केला नाही, तर अनेक नवीन गोष्टी सुद्धा निर्माण केल्यात. पुढे हे दोन्ही बंधू आचार्य असंग आणि बसुबंधू हे महान तत्त्वज्ञ म्हणून जगात प्रसिद्ध झाले. त्यांच्या ग्रंथांचे तिबेटी व चीनी भाषेसह अनेक देशांनी आपापल्या भाषेत भाषांतर केले, ते ग्रंथ आजही त्यांनी जपून ठेवले आहेत. तिबेटमध्ये त्यांचे ग्रंथ हे अतिशय पवित्र मानले जातात. परंतु भारतातील या महान आचार्यांबाबत भारतीयांनाच माहिती नाही, ही शोकांतिकाच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)