शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

रिपब्लिकन जनतेला एका मंचावर आणण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागासवर्गीयांच्या समस्या आणि अडचणी समजून घेऊन त्यांच्या विकासाला प्राथमिकता देण्याची गरज आहे. यासाठी सर्वांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागासवर्गीयांच्या समस्या आणि अडचणी समजून घेऊन त्यांच्या विकासाला प्राथमिकता देण्याची गरज आहे. यासाठी सर्वांना एका मंचावर आणणे हे महत्वाचे असल्याचे मत रिपब्लिकन आघाडी कार्यकर्ता संमेलनात व्यक्त झाले. टेका सिद्धार्थ नगर येथील राजाभाऊ खोब्रागड़े सभागृहात ‘रिपब्लिकन भारताच्या निर्मितीसाठी रिपब्लिकन जनतेचे एकसंघ आंदोलन’ या विषयावर झालेल्या मेळाव्यात ही भावना व्यक्त करण्यात आली.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन विचारवंत विनायक जामगडे होते. ते म्हणाले, मागील काही वर्षांपासून संविधानात असलेल्या मागासवर्गियांच्या तरतुदी संपविण्याचा प्रयत्न होत आहे. देश संविधानाच्या माध्यमातूनच चालणार आहे. त्यामुळेच संविधनाच्या रक्षणासाठी सर्वांची एकजूट आवश्यक आहे. हे होण्यासाठी रिपब्लिकन विचाराच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजाची शक्ती वाढवायला हवी.

यावेळी आघाडीचे संजय पाटील यांनीही सर्वांना एकत्र येण्याचे आणि संघटनात्मक शक्ती वाढविण्याचे आवाहन केले. छाया खोब्रागडे, मेघराज काटकर, विजय बागुल, भूपेश थुलकर, जावेद अन्सारी पाशा, प्रवीण खोब्रागडे, सागर डबरासे, असलम खान मुल्ला, राहुल प्रधान, देशक खोब्रागडे, सिद्धार्थ पाटील, राहुल मून आदींसह अनेकांनी सहभाग घेतला.