शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

लॉकडाउनमुळे छिंदवाड्यात अडकली आई : मुलीची खुशाली जाणण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 10:00 PM

मुलीची परीक्षा सुरू असतानाच कुटुंबातील अचानक आलेल्या प्रसंगामुळे मुलीला सोडून आईवडिलांना आपल्या गावी जावे लागले. नेमके याचवेळी कोरोना विषाणूच्या उद्रेकाने देशातील शहरे लॉकडाऊन झाली.

ठळक मुद्देनागपुरात मुलीशी संपर्क होत नसल्याने वाढली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलीची परीक्षा सुरू असतानाच कुटुंबातील अचानक आलेल्या प्रसंगामुळे मुलीला सोडून आईवडिलांना आपल्या गावी जावे लागले. नेमके याचवेळी कोरोना विषाणूच्या उद्रेकाने देशातील शहरे लॉकडाऊन झाली. या अघटित प्रसंगामुळे आई आणि मुलीचा संपर्क तुटला. आपली मुलगी सुरक्षित आहे की नाही या चिंतेमुळे कौटुंबिक कारणासाठी छिंदवाड्याला गेलेली आई भयक्रांत झाली असून मुलीची खुशाली जाणण्यासाठी टाहो फोडत आहे.कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. ही परिस्थिती नियंत्रित ठेवून विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता ही संचारबंदी अत्यावश्यक असली तरी यामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. जे घरात आहेत ते घरात आणि जे बाहेर आहेत ते बाहेरच अडकले आहेत आणि याची एकेक उदाहरणे समोर येत आहेत. या लॉकडाऊनमुळे आईमुलीची ताटातूट होण्याचा भीषण प्रसंग पिटेसूर, गोरेवाडा येथील कहार कुटुंबावर ओढवला आहे. राजेश कहार व त्यांची पत्नी सुनंदा कहार हे मूळचे छिंदवाडा येथील रहिवासी असून कामाच्या शोधात नागपूरला आलेले हे कुटुंब गोरेवाडाजवळ पिटेसूरच्या हनुमान मंदिराजवळ राहत आहे. त्यांच्यासोबत त्यांची १३ वर्षीय मुलगी कशिश ही सुद्धा राहते. मिळालेल्या माहितीनुसार छिंदवाडा येथील एका नातेवाईकाचे निधन झाल्याने ६ मार्च रोजी आईवडील छिंदवाड्याला निघाले. सुनंदा यांचा भाऊ जवळच राहतो. मुलीची परीक्षा सुरू असल्याने भावाच्या आसऱ्याने तिला येथेच सोडून ते गावाकडे निघाले. निधनाचे सोपस्कर आटोपून लवकर परत येऊ असा त्यांचा विचार होता. मात्र याच काळात कोरोना विषाणूचे संकट आपल्याही देशावर ओढवले. या संकटाला थोपविण्यासाठी आधी विविध राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. मध्य प्रदेशही त्यातील एक. त्यानंतर महाराष्ट्रातही संचारबंदी लागू करण्यात आली आणि आता तर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.यामुळे जे जिथे आहेत तेथेच अडकले. सुनंदा आणि राजेश कहार हे सुद्धा सध्या छिंदवाड्यात अडकले आहेत. सुरुवातीला काही दिवस मुलीशी संपर्क होत होता. मात्र गेल्या दोन दिवसापासून मुलीशी संपर्कच होत नसल्याने त्यांची चिंता वाढायला लागली. शेजाऱ्यांशीही संपर्क होत नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आपली मुलगी सुरक्षित आहे की नाही, या विचाराने छिंदवाड्यात अडकलेले हे कुटुंब भयक्रांत झाले असून मुलीची परिस्थिती जाणण्यासाठी आईने टाहो फोडला आहे. आपल्या मुलीला मानेवाडा येथे राहणाऱ्या तिच्या आजीकडे सुखरूप सोडावे, अशी याचना तिची आई करीत आहे. पोलिसांपर्यंत त्यांची विनंती पोहचावी म्हणून ती धडपड करीत आहे.गृहमंत्र्यांनी लगेच पोलिसांना दिल्या सूचनादरम्यान आईचा हा टाहो गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोहचला. या माहितीची लगेच दखल घेत मुलीला मदत पोहचविण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. आईच्या सांगण्यानुसार मुलीला तिच्या मानेवाडा येथे राहणाऱ्या आजीपर्यंत पोहचविण्याच्या सूचना त्यांनी पोलीस विभागाला दिल्या आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर