शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

पद्धत सारखीच, आमिषही एकसारखेच!

By admin | Updated: May 11, 2014 01:23 IST

उजेडात आलेल्या सर्व घोटाळेबाजांची पध्दत एकसारखीच आहे. अल्पावधीत दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून त्यांनी सर्वसामान्यांची रक्कम स्वत:च्या ड्रॉवरमध्ये वळती केली.

नागपूर : उजेडात आलेल्या सर्व घोटाळेबाजांची पध्दत एकसारखीच आहे. अल्पावधीत दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून त्यांनी सर्वसामान्यांची रक्कम स्वत:च्या ड्रॉवरमध्ये वळती केली. जास्तीत जास्त गुंतवणूकदार आणि त्यांची रक्कम उकळण्यासाठी या सर्वांनी अनेक दलाल नेमले. कमिशन मिळवण्यासाठी या दलालांनी आपल्या नातेवाईकांच्याच कमाईवर डल्ला मारला आणि त्यांची आयुष्याची कमाई या घोटाळेबाजांच्या हवाली केली. तीन वर्षात तीन हजार कोटींचे घोटाळे २०१३ मध्ये नागपूर-विदर्भच नव्हे तर महाराष्टÑात खळबळ उडवून देणारा श्री सूर्या समूहाचा घोटाळा उजेडात आला. समीर जोशी या थंड डोक्याच्या गुन्हेगाराने ठिकठिकाणच्या गोरगरीब आणि श्रीमंत, अतिश्रीमंतांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १००० कोटींपेक्षा जास्त रुपये गोळा केले. या रकमेतून त्याने ठिकठिकाणी ऐशोआरामाची व्यवस्था करवून ठेवली. मोठमोठे मॉल, कार्यालये, बहुमजली इमारती, फॉर्म हाऊस, आलिशान सदनिका विकत घेतल्या अन् गुंतवणूकदारांना ठेंगा दाखवला. १४ सप्टेंबर २०१३ ला त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. नागपूर पोलिसांनी समीर आणि पल्लवीला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली अन् कारागृहात डांबले. नंतर अमरावती, अकोला, पुणे आदी शहरातही जोशी दाम्पत्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. सात महिन्यांपासून त्यांची जेलयात्रा सुरू आहे. सर्वसामान्यांना धडकी भरविणारे हे घोटाळे ताजे असतानाच आता वासनकर समूहाच्या बोगसबाजीचा खुलासा झाला आहे. अल्पावधीत दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून प्रशांत वासनकर, त्याचे नातेवाईक आणि चेल्याचपाट्यांनी ४ ते ५ हजार गुंतवणूकदारांकडून सुमारे १५०० कोटी रुपये गोळा केले. नियोजित अवधीनंतर या गुंतवणूकदारांनी आपली रक्कम परत मागितली असता त्याने टाळाटाळ केली. गेल्या वर्षभरापासून तो टालमटोल करीत असल्यामुळे अखेर दोन दिवसांपूर्वी विवेक पाठक यांनी गुन्हेशाखेत तक्रार दिली. पोलिसांनी शुक्रवारी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. उपराजधानीत यापूर्वी अमन आणि राजश्री हेमानी यांचा १५० ते २०० कोटींचा घोटाळा, जिल्हा बँकेचा पावणेदोनशे कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांनी उल्हास खरे नामक महाठगाला जेरबंद केले. हा उल्हास नागपूरच्या लक्ष्मीनगर चौकातील रहिवासी असून, त्याने देशभरातील हजारो गुंतवणूकदारांना ५ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांनी गंडविल्याची चर्चा होती. बदलती ओळख इंग्रज राजवटीत शून्य मैल (झिरो माईल) मुळे देशाचे हृदयस्थान अशी नागपूरची ओळख देशविदेशात रुजली. महान सुफी संत आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक बाबा ताजुद्दीन यांच्यामुळे बाबांचे शहर म्हणून नागपूर देशविदेशात ओळखले जाऊ लागले. संघ मुख्यालय आणि दीक्षाभूमीमुळे नागपूरची वेगळी ओळख निर्माण झाली. संत्र्याचे शहर म्हणूनही नागपूर सर्वत्र ओळखीचे ठरले. अलीकडे मिहान प्रकल्पाने नागपूरला देशतील वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नवी ओळख दिली. यासोबतच दरवर्षी नागपुरात उजेडात येणार्‍या शहराने आता नागपूरवर घोटाळ्याचे शहर म्हणूनही बोट ठेवले जात आहे.