शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

ंिहंदी-मराठी गझलांचा रंगलेला नजराणा

By admin | Updated: January 19, 2015 00:48 IST

मुंबईचे सुप्रसिद्ध गायक माधव आणि सुचित्रा भागवत यांच्या सुमधुर गायनाने शीतलहरींची सायंकाळ संस्मरणीय ठरली. संगीत रसिकाग्रणी बाबासाहेब उत्तरवार यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त

रसिकाग्रणी बाबासाहेब उत्तरवार सहस्रचंद्रदर्शन सोहळा
नागपूर : मुंबईचे सुप्रसिद्ध गायक माधव आणि सुचित्रा भागवत यांच्या सुमधुर गायनाने शीतलहरींची सायंकाळ संस्मरणीय ठरली. संगीत रसिकाग्रणी बाबासाहेब उत्तरवार यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त या हिंदी-मराठी गझलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माधव आणि सुचित्रा भागवत यांच्या सादरीकरणाने ही मैफिल रंगतदार झाली.
याप्रसंगी गोपालदास श्राफ, सूरमणी पं. प्रभाकर धाकडे, ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख, गायक माधव भागवत, बाबासाहेब उत्तरवार, प्रा. अरविंद देशमुख, कवी बळवंत लामकाणे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी उदयोन्मुख प्रतिभावंत गायिका रेणुका इंदूरकर हिने ‘का करु सजनी आए न बालम...’ ही ठुमरी आणि संत मीराबाईचे भजन ‘ओ मारो बाला गिरधारी..’ सुरेल स्वरात सादर करून उपस्थितांची दाद घेतली. त्यानंतर माधव आणि सुचित्रा भागवत यांच्या हिंदी-मराठी गझल व गीतांनी उपस्थितांच्या मनाचा ताबा घेतला. कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या वेचक गझलांचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सादर करणाऱ्या या कलावंत दाम्पत्याच्या भावपूर्ण गायनाने श्रोत्यांना एक वेगळी अनुभूती लाभली. सुरेश भट यांच्या ‘मनाप्रमाणे जगावयाचे किती, किती छान बेत होते, कुठेतरी दैव नेत होते’ ही गझल माधव भागवत यांनी सादर केली. त्यांच्या पहिल्याच गझलने रसिकांना आनंद दिला.
यानंतर हळव्या स्वरानुबंधाच्या ‘नुसतेच बहाणे होते, नुसतेच खुलासे होते, कोरड्या तुझ्या शब्दांचे कोरडे दिलासे होते..., आज का तुला माझे एवढे रडे आले.., कल चौदविकी रात थी..., रंजिश ही सही..., तुझा हात मी प्रेमाने जरासा दाबला होता... जिंदगी मे तो सभी प्यार किया करते है..’ आदी दिलखूश गझलांनी कार्यक्रमात रंगत आणली.
सुचित्रा यांनी ‘मी मज हरपून.., केव्हातरी पहाटे, सहज सख्या एकदा येई सांजवेळी, आज जाने की जिद ना करो..., तु नभातले तारे माळलेस का तेव्हा.., मागे उभा मंगेश’ आदी गीत, गझलने समाँ बांधला. कार्यक्रमात सूरमणी पं. प्रभाकरराव धाकडे यांची व्हायोलिन संगत होती. जनार्दन लाडसे आणि संजय इंदूरकर यांनी तबला व संवादिनीवर साथ दिली. निवेदन अरविंद देशमुख यांनी तर आभार विवेक घवघवे यांनी मानले. प्रमिला उत्तरवार, अनिल, रागिणी, जितेंद्र उत्तरवार, जयश्री मुळीक यांनी कलावंतांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)