शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

संविधान बदलण्यासाठी सरसावणारे हात कलम करू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 6:47 PM

मनुवादी विचार देशात डोके वर काढू पाहत आहे. संविधानापेक्षा मनुस्मृती यांना श्रेष्ठ वाटू लागली आहे. भाजपा संविधानाला नख लावू पाहत आहे.मात्र, रक्त सांडले तरी संविधान बचावासाठी आम्ही लढाई लढू. संविधान बदलण्यासाठी सरसावणारे हात कलम करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

ठळक मुद्देअजित पवार यांचा इशारा : राष्ट्रवादीचा ‘संविधान बचाव, देश बचाव मेळावा’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनुवादी विचार देशात डोके वर काढू पाहत आहे. संविधानापेक्षा मनुस्मृती यांना श्रेष्ठ वाटू लागली आहे. भाजपा संविधानाला नख लावू पाहत आहे.मात्र, रक्त सांडले तरी संविधान बचावासाठी आम्ही लढाई लढू. संविधान बदलण्यासाठी सरसावणारे हात कलम करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपुरातील देशपांडे सभागृहात ‘संविधान बचाव, देश बचाव मेळावा’ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी पेटती मशाल उंचावून संविधान रक्षणाची शपथ घेण्यात आली. मेळाव्याला माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, रमेश बंग, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रकाश गजभिये, पक्षाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, आ. विद्या चव्हाण, आ.सुमन पाटील, आ. ज्योति कलानी, आ. संध्या कुपेकर, आ. दिपीका चव्हाण, माजी आमदार उषा दराडे, शहर अध्यक्ष अलका कांबळे यांच्यासह विदर्भातील सर्व महिला जिल्हाध्यक्ष उपस्थित होत्या. या वेळी अजित पवार म्हणाले, संतांपेक्षा मनु श्रेष्ठ आहे, असे सांगण्याचे धाडस संभाजी भिडे करतातच कसे. त्यांच्या मागचा मास्टर मार्इंड कोण आहे, असा सवाल करीत कुठल्या दिशेने कारभार सुरू आहे, याचा जाब त्यांनी सरकारला विचारला. कुठल्याही क्षणी लोकसभा निवडणूक लागू शकते, असे सांगत भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.जयंत पाटील म्हणाले, भाजपाचे केंद्रीय मंत्री संविधान बदलण्यासाठी आम्ही सत्तेत आल्याचे सांगतात. सरसंघचालक मोहन भागवत आरक्षणाच्या फेरविचारासाठी समिती नेमण्याची शिफारस करतात. भाजपा संविधानाला धक्का पोहचवू पाहत असल्याचे सांगत भाजपचे मनसुबे उधळून लावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.तुमची नियत साफ नाही : भूजबळमेळाव्यात भूजभळ यांचे फुले पगडी घालून स्वागत करण्यात आले. या वेळी भूजबळ म्हणाले, मनुवादी कायदा हीन होता. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले. पण आज पुन्हा मनुवादी कार्यक्रम सुरु झाले आहेत. लोकशाहिचे चक्र उलटे फिरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विरोधात बोलणाऱ्यांना गोळ्या घातल्या जात आहे. हे खडा फेकून बघतात, पचला तर पुढे जातात. अंधाराने भरलेली मनुस्मृती नकोच असे सांगत संविधानामुळे लोकशाही जिवंत राहिली. देशात वाढलेला हिंसाचार, जातीवाद व मुस्कटदाबी वाढल्यामुळे संविधान बचाव म्हणण्याची वेळ आली आहे. संविधान विरोधी पावले अडविण्यासाठी लोकशाही मागार्ने रस्त्यावर यावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. गोरक्षेच्या नावावर माणसे मारता तुम्ही, चांगले कपडे घातले म्हणून दलितांना मारता तुम्ही. अशांवर कारवाई होत नाही. शालेय पुस्तकांच्या ठिकाणी धार्मिक पुस्तके वाटली जात आहेत. तुमची नियत साफ नाही. मुहं मे राम बगल मे छुरी सुरु आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

ईव्हीएम व मनस्मृतीची होळीमेळाव्यानंतर नेत्यांच्या हस्ते ईव्हीएम व मनस्मृतीची होळी करण्यात आली. या वेळी संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबादचे नारे देण्यात आले.असे झालेत ठराव ; मेळाव्यात एकूण पाच ठराव एकमताने संमत करण्यात आले

  •  संविधान बचाव कार्यक्रम ग्रामस्तरापर्यंत राबविला जाईल.
  • राज्य महिला आयोगास वाढीव अधिकार देऊन प्रत्येक जिल्ह्यात आयोगाचे केंद्र स्थापन करावे.
  •  लोकसभेत ३३ टक्के महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करावे.
  •  सातबाराच्या उताऱ्याच्या मागच्या बाजुला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा फोटो छापावा.
  •  शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर