शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची ‘लेटलतिफी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST

नागपूर : ठरावीक दिवसात लोकांची काम व्हावीत याकरिता शासनाने ‘सेवा हमी कायदा’ केला आहे. त्यानंतरही एकाच कामासाठी लोकांना शासकीय ...

नागपूर : ठरावीक दिवसात लोकांची काम व्हावीत याकरिता शासनाने ‘सेवा हमी कायदा’ केला आहे. त्यानंतरही एकाच कामासाठी लोकांना शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. त्याचा लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. कर्मचाऱ्यांच्या ‘लेटलतिफी’चा अनुभव सेतू कार्यालयात लोकांना विविध प्रमाणपत्रे बनविताना येत आहे.

शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा वेग सर्वांनाच माहीत आहे. केवळ एक प्रमाणपत्र बनविण्यासाठी लोक आपली सर्व कामे सोडून संपूर्ण दिवस रांगेत उभे राहतात आणि आपला क्रमांक येण्याची वाट बघतात. समजा खिडकीजवळ पोहोचले आणि कर्मचाऱ्यांच्या जेवणाची वेळ झाली तर ते कामे सोडून खिडकी बंद करतात. कर्मचाऱ्यांच्या अशा मनमानी व्यवहारामुळे लोकांना संपूर्ण दिवस केवळ एकाच कामासाठी खर्ची घालावा लागतो. कागदपत्रांमध्ये थोडीही चूक असेल तर कर्मचारी त्यात सुधारणा करून आणण्यास सांगताे. त्यानंतर कागदपत्रांच्या तपासणीसाठी नव्याने रांगेत उभे राहावे लागते. त्यात पुन्हा चूक आढळली तर कर्मचारी दुसऱ्या दिवशी बोलवितात. असा अनुभव सर्वांना येत असल्याने ‘नको ते शासकीय कार्यालय आणि नको ते काम’ अशी म्हण आता प्रचलित होऊ लागली आहे.

एकावेळी बनते केवळ एकच प्रमाणपत्र

सेतू कार्यालयात एकावेळी एकच प्रमाणपत्र बनविले जाते. जर एकपेक्षा जास्त प्रमाणपत्र बनवायचे असेल तर दुसऱ्या दिवशी पुन्हा रांगेत उभे राहावे लागते.

कागदपत्रांची तपासणी बनली डोकेदुखी

रहिवासी (डोमिसाईल) दाखला बनविण्यासाठी सेतू कार्यालयात दोन दिवसांपासून येणारी रवीना म्हणाली, सकाळपासून रांगेत उभी असून तीन तासानंतर क्रमांक आला आहे. एका कागदात त्रुटी आढळली तर पुढील कागद कर्मचारी तपासणार नाहीत. कर्मचाऱ्याने संपूर्ण कागदपत्रांची तपासणी करून त्रुटी सांगाव्यात. पण सेतू कार्यालयातील कर्मचारी एकावेळी संपूर्ण कागदपत्रांची तपासणी करीत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही कागदपत्रांची तपासणी करावीच लागते. लहान कामासाठी संपूर्ण दिवस वाया जातो आणि दुसरे काम होत नाही.

विद्यार्थी आणि पालक त्रस्त

शिवम बारावीचा विद्यार्थी आहे. त्याला कॉलेजमध्ये जमा करण्यासाठी उत्पन्नाचा दाखल आणि जात प्रमाणपत्राची गरज आहे. तो गेल्या चार दिवसांपासून सेतू कार्यालयात चकरा मारत आहे. कर्मचारी एकाचवेळी संपूर्ण माहिती देत नाही. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वडिलांची गरज असते. या कामासाठी त्यांनाही काम सोडून यावे लागत आहे. शिवम म्हणाला, येथे विशिष्ट प्रमाणपत्र काढण्यासाठी शासनाने लोकांना विस्तृत माहिती देणारा सूचना फलक लावावा.

पार्किंगसाठी त्रास

सेतूमध्ये कार्यालयात जाण्यासाठी काही ठिकाणी पेड तर काही ठिकाणी फ्री पार्किंग आहे. अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र बनविण्यासाठी तीन ते चार दिवस सतत चकरा माराव्या लागतात. पेड पार्किंगमध्ये दुचाकी ठेवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो. पार्किंगवरून अनेकदा वाद होत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत.

संपूर्ण परिसर अस्वच्छ

सेलू कार्यालय परिसरात नेहमीच अस्वच्छता असते. सफाई कर्मचारी परिसर साफ केल्यानंतर परिसरातच कचऱ्याचा ढीग लावतात. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. परिसर नियमित स्वच्छ ठेवण्याची लोकांची मागणी आहे.