शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाने पालक हिरावलेल्या मुलांना बालगृहाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:07 IST

काेदामेंढी येथील रहिवासी अरुण माेहनकर माेलमजुरी करून कुटुंबाचे संगाेपन करीत हाेते. अशा अभावग्रस्त परिस्थितीतही १८ वर्षांचा माेठा मुलगा प्रणय ...

काेदामेंढी येथील रहिवासी अरुण माेहनकर माेलमजुरी करून कुटुंबाचे संगाेपन करीत हाेते. अशा अभावग्रस्त परिस्थितीतही १८ वर्षांचा माेठा मुलगा प्रणय बारावीत प्रथम श्रेणीत पास झाला. मजवी मुलगी आंचल दहाव्या वर्गात आहे, तर लहान काजल सहाव्या वर्गात. परिस्थिती हालाखीची असली तरी बापाचा आधार हाेता. मात्र काेराेनाच्या भयावह दुसऱ्या लाटेने बाप नावाचा एकमेव आधारही हिरावला गेला. एप्रिलमध्ये काेराेना संसर्गाने त्यांचे निधन झाले. दीड महिना झाल्यानंतर स्वत:ला सावरत प्रणय बहिणींच्या पाेटासाठी काम मिळावे म्हणून बाहेर पडला. मात्र त्याला काम देणार तरी काेण? माेठी आई घरी गेली तेव्हा घरात चूलही पेटली नसल्याचे दिसले. धान्याचे डबे रिकामे हाेते. काही तरुणांनी साेशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. त्यानंतर बालकल्याण समितीची टीम काेदामेंढीला पाेहोचली. त्यांनी तिन्ही मुलांना नागपूरला आणले. दाेन्ही बहिणींना खसाळामसाळा येथील आशाकिरण गृहात ठेवले, तर मुलाला शासकीय मुलांच्या अनुरक्षण गृहात ठेवले. ताटातूट झाली असली तरी या अनाथ झालेल्या भावंडांना आधार मिळाला.

पहिल्या लाॅकडाऊनमध्ये पाच मुले

काेराेनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी पालकांच्या मृत्यूमुळे अनाथ झालेल्या पाच बालकांना बालगृहाचा आधार मिळाला हाेता. नुकतेच नागपुरातील दाेन भावंडांबाबतही असेच घडले हाेते. त्यांना बालगृहात आणण्यातही आले. मात्र शहरातच असलेले मुलांचे आजाेबा पालकत्व स्वीकारण्यास तयार झाल्यानंतर त्यांना त्यांच्या सुपुर्द करण्यात आल्याची माहिती नागपूर जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात यांनी दिली.

शासनाचे टास्क फाेर्स

राजीव थाेरात यांनी माहिती देताना सांगितले, अशा अनाथ झालेल्या मुलांसाठी राज्य शासनाने टास्क फाेर्स तयार केली आहे. त्यांची काळजी व संरक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा मुलांसाठी केंद्र सरकारतर्फे ३० हजार तर राज्य शासनातर्फे २० हजार रुपये मुलांच्या खात्यात जमा केले जाते. नागरिकांनी अशा मुलांची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत असून, त्यासाठी प्रशासनातर्फे रुग्णालयाबाहेर पाेस्टर लावून जागृती करण्यात येत असल्याचे थाेरात यांनी सांगितले.

शासनाने धाेरण ठरविण्याची गरज

काेराेनाच्या महामारीने पालक हिरावल्यामुळे राज्यात शेकडाे मुले पाेरकी झाली आहेत. अशा मुलांचे सर्वेक्षण करून त्यांच्या पुनर्वसनाची व शिक्षणाची जबाबदारी शासनाने उचलावी. यासाठी ठाेस धाेरण ठरविणे गरजेचे आहे.

- दीनानाथ वाघमारे, संघटक, संघर्ष वाहिनी,